Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समीर वानखेडेंची नोकरी जाते की नवाब मलिकांचं मंत्रिपद जातं हे पाहू : रामदास आठवले

Webdunia
रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (09:57 IST)
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल विभागाचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांची नोकरी घालवण्याचा इशारा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला होता. याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
 
समीर वानखेडे यांची नोकरी जाते की नवाब मलिकांचं मंत्रिपद जातं, हे पाहूया, असं आव्हान आठवले यांनी दिलं आहे.
 
शनिवारी (23 ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.
 
राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांकडून राज्यात कारवाया होत असल्या तरी त्यातून शरद पवार यांच्या कुटुंबाला अथवा कुणालातरी त्रास देण्याचा उद्देश नाही, असं आठवले यांनी स्पष्ट केलं.
 
या यंत्रणा पूर्णत: स्वतंत्र असून, त्यांच्या कारवाईंमध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा संबंधच येत नसल्याचं त्यांनी म्हटलं.
 
बातमीनुसार राजकीय नेत्यांनी तपास चालू असताना तपास यंत्रणा आणि त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तर हा कायदा व सुव्यवस्थेला मोठा धोका आहे, असं मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments