Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप महापौर उपमाहापौर यांना लॉटरी

Lottery
Webdunia
बुधवार, 14 ऑगस्ट 2019 (10:25 IST)
नाशिकच्या महापौर रंजना भानसी व उपमहापौर प्रथमेश गीते यांना ३ महिने मुदत वाढ मिळाली आहे. त्यामुळे या दोघांना तीन महिन्याचा अधिक कालावधी मिळाल्यामुळे मुदतवाढीची लॉटरी लागल्याची चर्चा नाशिककरांमध्ये आहे. या आधी नाशिकचे महापौर दशरथ पाटील आणि डॉ शोभा बच्छाव यांना हि अशीच मुदतवाढ मिळाली होती. 
 
१५ सप्टेंबर ला नाशिकच्या महापौर उपमहापौर यांच्या निवडणूका होणार होत्या परंतु विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महानगरपालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरुपात ३ महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हि मुदत वाढ नाशिकच्या महापौर आणि उपमहापौर यांना  मिळणार असून अडीच वर्षाचा कालावधीला ३ महिने मुदत वाढ मिळणार आहे.परंतु भविष्यात येणाऱ्या महापौर व उपमहापौर यांचा कालावधी ३ महिन्यांनी कमी होणार आहे. 
 
राज्यात ऑक्टोबर-२०१९ मध्ये विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे महापौर निवडणूक पार पाडण्यात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी महापौर व उप महापौरांच्या निवडणुका तात्पुरत्या ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महापौर व उपमहापौर निवडणूक पुढे ढकलण्यासाठी महाराष्ट्र महानगरपालिका (राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका यांच्यामुळे विवक्षित महानगरपालिकांचे महापौर व उपमहापौर पदांसाठीच्या) निवडणुका तात्पुरत्या पुढे ढकलणे अधिनियम- २०१९ हा अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील ईडी कार्यालयात आग, फायली जळून खाक

जर पाकिस्तानने पीओके देण्यास नकार दिला तर भारताने युद्ध करावे', आठवलेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबईतील ईडी कार्यालयात भीषण आग

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १२ दिवसांची वाढ, एनआयए न्यायालयाचा निर्णय

'दहशतवाद संपला पाहिजे पण त्यावर राजकारण होऊ नये', पहलगाम हल्ल्यानंतर अबू आझमी यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments