Marathi Biodata Maker

निवडणूक जनमत ओपनिंग पोल आणि इतर चाचण्या केल्या बंद

Webdunia
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017 (15:03 IST)
राज्यात होत असलेल्या १० महापालिका, तर  जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जाहिरातबाजीवर कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या राजकिय पक्षांना आता चांगलेच वळणावर आणले आहे. तर निवडणुकीत मतदान करत असताना कोणताही प्रभाव दिसू नयेया  करिता निवडनुक आयोगाने कठीण निर्णय घेतला आहे . यामध्ये  निवडणुकांचे दोन्ही टप्पे पाठोपाठ असल्याने मतदारांवर पडणारा संभाव्य प्रभाव लक्षात घेऊन प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर राजकीय पक्ष , उमेदवारांना वृत्तपत्रे आणि इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांत प्रचारविषयक जाहिराती प्रसिद्ध करता येणार नाहीत. त्याचबरोबर 14 फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते 21 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान समाप्तीपर्यंत जनमत (ओपिनियन पोल) व मतदानोत्तर (एक्‍झिट पोल) चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यावर बंदी घालण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.त्यामुळे या पक्षाची हवा तो पक्ष पुढे आणि हा उमेदवार निवडून येणार असे कोणतेही चित्र निर्माण करता येणार नाही, त्यामुळे मतदार आपले मत योग्य पद्धतीने विना प्रभावाचे देवू शकणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

ओला, उबर, रॅपिडो उद्या देशभरात बंद राहणार, कॅब चालकांनी देशव्यापी संप पुकारला

भारतीय महिला संघाचा क्वार्टर फायनलमध्ये चीनकडून पराभव, आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमधून बाहेर

ओडिशाच्या तीन न्यायालयांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या

आरसीबीने दुसऱ्यांदा डब्ल्यूपीएलचे विजेतेपद जिंकले

मुंबई पोलिसांनी ११ कोटी फसवणुकीच्या प्रकरणात ५ राज्यांमधून ७ आरोपींना अटक केली

पुढील लेख
Show comments