Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सणासुदीला महाराष्ट्र अंधारात?

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (16:04 IST)
नागपूर : कोळसा खाणींच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस व महानिर्मितीच्या ढिसाळ नियोजनामुळे महाराष्ट्रातील वीज केंद्रांना कोळसा मिळेनासा झाला आहे. बहुतांश वीज केंद्रांमध्ये  तीन ते चार दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. एकूण गरजेच्या 10 टक्के कोळशाचा वापर करण्याचे निर्देश दिले. पाऊस थांबल्यानंतर उष्णतेत वाढ होऊन विजेची मागणी वाढली तर ती पूर्ण करणे या परिस्थीतीत कठीण आहे. दुसरीकडे केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रासह अन्य राज्यांना मागणीनुसार कोळशाची आयात वाढविण्याचा सल्ला दिला आहे.
 
देशात कोळशाची टंचाई विचारात घेता केंद्र सरकारने एकूण गरजेच्या 10 टक्के विदेशी कोळशाचा वापर करण्याचे निर्देश दिले होते. आता केंद्राने देशभरातील स्थितीचा आढावा घेत सर्व वीजनिर्मिती कंपन्यांना गरजेनुसार आयात वाढविण्याचा सल्ला दिला आहे.
 
एकूण वापराच्या 30 टक्क्यांपर्यंत कोळसा आयात करण्याची परवानगी देण्याचे संकेत केंद्राने दिले आहे. दुसरीकडे राज्यातील देशी कोळशाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. महानिर्मितीच्या दुर्लक्षामुळे मान्सूनपूर्व स्टॉक होऊ शकला नाही. आता पावसामुळे कोळशाचा पुरवठा प्रभावित झाला आहे. अशीच स्थिती राहिली तर मान्सूननंतर वाढलेली विजेची मागणी पूर्ण करणे कठीण जाईल.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments