Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तर पुन्हा भारनियमन, ऊर्जामंत्री यांचे संकेत

Webdunia
मंगळवार, 1 मार्च 2022 (07:29 IST)
मोठय़ा प्रमाणावरील ग्राहकांचे वीज देयक थकित असल्याने महावितरण आर्थिक संकटात आहे. थकबाकी वाढल्यास आगामी काळात राज्यातील जनतेला पुन्हा भारनियमनास सामोरे जावे लागेल, असे संकेत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी  अकोला येथे दिले. वीज केंद्रांच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. 
 
‘‘महावितरणला पैसे देऊन बाहेरून वीजखरेदी करावी लागते. करोना काळात सर्वत्र टाळेबंदी असताना महावितरणकडून राज्यातील जनतेला अखंडित वीजपुरवठा करण्यात आला. करोनामुळे काही जणांच्या रोजगारावर संकट आले हे मान्यच. पण,  वीज वापरली असेल तर देयकाचे पैसे भरावेच लागतील’’, असे नितीन राऊत म्हणाल़े
 
राज्यात कोळशाचा साठा अपुरा आहे. तो एक-दोन दिवस पुरेल इतकाच आहे. त्याचा परिणाम विजेच्या उत्पादनावर होऊ शकतो. उत्पादन कमी झाल्यास विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्यात भारनियमन केले जाऊ शकते, असेही ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

या दिवशी महाराष्ट्रात आणि मुंबईत होणार Monsoon ची एन्ट्री, जाणून घ्या मोठे अपडेट

पुढील लेख
Show comments