Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Weather Update :काय म्हणता, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्‍ह्यांत अतिसतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Update :काय म्हणता  नागपूर  चंद्रपूर व गडचिरोली या जिल्‍ह्यांत अतिसतर्कतेचा इशारा
Webdunia
बुधवार, 15 मार्च 2023 (21:45 IST)
भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवारी (दि.१६) व शुक्रवारी (दि.१७) अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच १९ मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवारी ( दि.१७) अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.
 
गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे‍ शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता असून, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. या काळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते. वित्त व  जिवीतहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अजित पवारांचा इशारा

औरंगजेबाच्या कबर वादात एनआयएची एन्ट्री,संभाजी नगरसह मराठवाड्यातील 9 शहरांवर कडक नजर

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधले जाणार-देवेंद्र फडणवीस

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये,रमजानमध्ये अजित पवारांनी कोणाला इशारा दिला

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी

पुढील लेख
Show comments