Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंबेडकर जयंती मिरवणुकीत भीषण अपघात, विजेच्या धक्क्याने 2 जणांचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (10:07 IST)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली आटोपून घरी परतत असताना अनेकांना विजेचा धक्का बसला. विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. ही घटना विरार परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मिरवणूक संपवून लोक घरी परतत होते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विरारमध्ये बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. रात्री नऊ वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कामगार घरी परतत होते. त्यावेळी ट्रॉलीवर 6 जण उभे होते, त्यावेळी गाडीवरील लोखंडी रॉड जवळच असलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफरवर आदळला, त्यामुळे संपूर्ण ट्रॉलीमध्ये विद्युत प्रवाह गेला.
 
 वाहनातील 6 जणांना विजेचा धक्का बसला
वाहनातील 6 जणांना विजेचा धक्का बसला. यामध्ये 30 वर्षीय रूपेश सुर्वे आणि 23 वर्षीय सुमित सुत नावाच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी 4 जण जखमी झाले असून, 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट

'लोकसभा मध्ये कमी सीट वर लढलो, पण विधानसभेमध्ये...', शरद पवारांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला दिला मोठा संकेत

जागतिक पर्जन्यवन दिन

Kabir Jayanti 2024 : संत कबीर दास भक्ती काळाचे एकमेव कवी

सर्व पहा

नवीन

डिपफेक व्हिडीओ पाहून केली गुंतवणूक, मुंबईतील डॉक्टरची सात लाखांना फसवणूक

महाराष्ट्रात पोलिसिंग अधिक प्रभावी आणि कार्यक्षम करण्यासाठी AI चा वापर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Atal Setu: अटल सेतु मध्ये तडे, नाना पटोलेंनी महायुति सरकार वर लावले भ्रष्टाचाराचे आरोप

शिष्टमंडळाने ओबीसी कार्यकर्त्यांची भेट घेतली,उपोषण संपवण्याचे आवाहन केले

महाराष्‍ट्र सरकार ने प्री-प्राइमरी ते वर्ग 4 पर्यंत मुलांसाठी घेतला मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments