Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कपडे धुण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

Webdunia
सोमवार, 31 ऑक्टोबर 2022 (20:56 IST)
सुरगाणा – तालुक्यातील गुजरात सीमेलगतच्या राशा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. उंबरठाण जवळील राशा येथील या दोन्ही रहिवाशी आहेत. या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, भुमिका नरेश राऊत (वय ११, इयत्ता ४थी) आणि उज्वला नरेश राऊत (वय ८, इयत्ता २ री) अशी मृत बहिणींची नावे आहेत. दोन्ही बहिणी रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास राशा देऊळपाडा येथून बर्डी येथील गावतळे येथे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुत असतांना थोरली बहिण भूमिका हिचा पाय घसरल्याने ती पाण्यात बुडाली. तिला वाचवण्यासाठी उज्वला हिने पाण्यात उडी मारली. मोठ्या बहिणीला वाचविण्याच्या नादात दोघींनी घट्ट मिठी पडली. या दुर्घटनेत दोन्ही बहिणी तलावात बुडाल्या. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. माहिती मिळताच दोन्ही बहिणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोन्ही बहिणींवर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. या दुर्घटनेबद्दल तहसिलदार सचिन मुळीक, नायब तहसिलदार राजेंद्र मोरे, गटविकास अधिकारी दिपक पाटील, गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी, आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे रतन चौधरी, पांडुरंग पवार, तुकाराम भोये, सुधाकर भोये आदींनी शोक व्यक्त केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments