Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी माणसा मुंबई हिंदी होतेय घसरतोय मराठी भाषिक टक्का

मराठी माणसा मुंबई हिंदी होतेय घसरतोय मराठी भाषिक टक्का
Webdunia
असंख्य बेटांपासून बनलेल्या मुंबई शहराला शेकडो वर्षांचा इतिहास असून, बॉम्बे ते मुंबई नामकरण, त्याला असलेला मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी राज्याची राजधानी ही मुंबईची ओळख आहे. मात्र  आता हि ओळख  हळूहळू पुसट होत चालली असे चित्र दिसू लागले  आहे. याच मराठी माणसांच्या मुंबईचा हिंदी भाषिकांचे शहर म्हणून प्रवास सुरु झाला  आहे. तर याचा परिणाम हा लोकसभा, विधानसभा निवडणुकांबरोबरच महापालिका निवडणुकीवरही होताना दिसला आहे. मराठीचा टक्का घसरल्याने शिवसेनेला भाजप वरचढ ठरत आहे. याबाबतचे चित्र गेल्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मराठी माणसाला विचार करायला लावणारी गोष्ट आहे. 
 
2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार मातृभाषेमध्ये हिंदी भाषिकांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढला असून,  2001 मध्ये ही संख्या २५.८८ लाख इतकी मोजली गेली  होती, तर  तीच दहा वर्षांत 35.98 लाख झाली असून,  म्हणजे 10 वर्षांत तब्बल 10 लाख हिंदी भाषिकांची संख्या वाढली आहे.  मराठी भाषिकांमध्ये 2.64 टक्क्यांची घट नोंदविली गेली असून,  2001 मध्ये 45.23 लाख मराठी मातृभाषिक होते, तेच 2011 मध्ये 44.04 लाख झाले आहेत. मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील हे बदल दिसून येतात. ठाणे, रायगडमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे.महाराष्ट्राच्या अन्य भागातून मुंबईला होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण १९६१ साली ४१.६ टक्के होते ते २००१ साली ३७.४ टक्के झाले. त्याचवेळी उत्तर प्रदेशातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण वाढले. १९६१ साली उत्तर प्रदेशातून मुंबईत १२ टक्के स्थलांतरीत येत होते तेच प्रमाण २००१ साली २४ टक्के झाले.
 
मराठी मातृभाषिकांची संख्या कमी झाली असली तरी आजही अन्य भाषिकांच्या तुलनेत मुंबईत मराठी मातृभाषिकांची संख्या जास्त आहे.  २००१ साली मराठी मातृभाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ४५.२४ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले. त्याच दशकभरात गुजराती भाषिकांची संख्या किंचित कमी झाली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे जे बोलत होते ते खरे आहे की काय असे ऐकून चित्र सध्या दिसून येते आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

'जर त्यांनी भाजपचा पर्दाफाश केला तर...', सुशांत प्रकरणात संजय राऊत म्हणाले- उद्धव यांनी नारायण राणेंना फोन केला नाही

Kunal Kamra's Controversy जे अधिकारात आहे चे बोलले पाहिजे- कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावर अजित पवार काय म्हणाले?

रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवण्याची संभाजीराजे छत्रपती यांची मागणी

बस चालवताना आयपीएल क्रिकेट सामना पाहिल्यामुळे ई-शिवनेरीच्या बस चालकाला निलंबित केले

महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी रोडमॅप तयार ,मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान

पुढील लेख
Show comments