Dharma Sangrah

लग्नात जेवताय सावधान अनेकांना विषबाधा

Webdunia
शनिवार, 12 मे 2018 (15:02 IST)
सध्या लग्नाच्या तिथी जोरात आहेत. अनेक ठिकाणी मंगलकार्यालये गर्दीने भरून गेली असून, अनेक ठिकाणी लग्न होत आहेत. मात्र जेवण करतांना सावधानता बाळगली पाहिजे, कारण सांगली येथील तासगाव भागातील लग्न समारंभात केलेल्या जेवणातून 100 हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत  तासगाव येथील एका मंगल कार्यालयात दोन दिवसांपूर्वी आरवडे आणि येळावी कुटुंबीयांचा लग्नसोहळा पार पडला होता. त्यामध्ये ही घटना घडली आहे.  या लग्नात जेवण केल्यानंतर काहींना उलटी आणि जुलाबाचा प्रचंड  त्रास झाला, त्यामुळे काही लोकांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर काहींना प्राथमिक आरोग्य केंद्र आरवडे येथे दाखल करण्यात आल आहे. वैद्यकीय अधिकारी कमी पडू लागल्याने मांजर्डे, डोर्ली आणि गौरगाव येथून वैद्यकीय मदत मागवण्यात आली असून आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे. लग्नात जेवणाबरोबरच मठ्ठा देण्यात आला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लोकांनी मठ्ठा मोठ्या प्रमाणात प्यायला होता. पण मठ्ठा बनवल्यानंतर तो बनवण्यासाठी वापरलेलं पाणी आणि त्यात टाकला गेलेला बर्फ हा दूषित असल्यामुळेच हा प्रकार झाला असवा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. त्यामुळे जेवण करताय तर लक्ष द्या, उगीच मिळतय म्हणून, फुकट कितीही खाऊ नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

प्रमाणपत्रासाठी लाच मागणे महागात पडले, एसीबीची कारवाई; मुख्याध्यापिकेला अटक

IPL 2026 कोलकाताला हरवून लखनौ अव्वल ५ मध्ये दाखल, गुणतालिकेत बदल

अजितदादांच्या खास लूकमध्ये पार्थ पवार यांनी खासदारकीची शपथ घेतली

अलविदा, बिहार! नितीश कुमार दिल्लीत परतले, आज राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेणार

मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये भीषण आग, प्रवाशांमध्ये घबराट

पुढील लेख
Show comments