Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Webdunia
मंगळवार, 19 जानेवारी 2021 (21:22 IST)
राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या जुन्या विषयांसह बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वर्षापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्चित केली आहे. यानुसार शाखा निहाय गट ए, बी, सी यामध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. 
 
यासंदर्भात ८ ऑगस्ट २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. मात्र ज्युनिअर महाविद्यालये आणि शिक्षकवर्गाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने शिक्षकांनी जुन्या अभ्यासक्रमाच्या विषय योजनेनुसार, विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. दरम्यान, जे विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत त्या विषयांचीच विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेच्या दृष्टीने तयारी केली. ही बाब बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले त्यावेळी ही बाब लक्षात आली. ज्यावेळी जे विषय अभ्यासक्रमातून वगळले गेले ते विषय परीक्षा अर्जात समाविष्ट नव्हते.
 
 
परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदा जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments