Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंत्री भुजबळांनी राजीनामा देऊन मराठा आरक्षणावर बोलावे

Webdunia
गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (08:13 IST)
कोल्हापूरमराठा विरुद्ध ओबीसी असा सुरु असलेला वाद निरर्थक आहे. ओबीसीचा मुद्दा पुढे करुन आंदोलन करण्याची काही गरज नाही. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका सरकारची नाही. तरीही मंत्री छगन भुजबळ राज्यात जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने करत आहेत. त्यांच्या या विधानांमुळे राज्यातील महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचा संदेश राज्याभर जात आहे. त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देवून मराठा आरक्षणावर बोलावे, असे वक्तव्य महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
 
मंत्री विखे-पाटील मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना मराठा आरक्षणाबाबत विचारले असता, त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या टिका करत त्यांच्या भुमिकेवर आक्षेप घेतला.
 
मंत्री विखे-पाटील म्हणाले, कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने आपली भुमिका स्पष्ट केली पाहिजे. मंत्री भुजबळ आज ज्या पद्धतीने मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत वक्तव्य करत आहेत, त्यावरुन राज्यात जातीय तेढ निर्माण होण्याची भिती आहे. मंत्री भुजबळ यांच्यासारख्या नेत्याकडून अशी अपेक्षा नसल्याची टिका मंत्री विखे-पाटील यांनी केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिंदे सरकारने स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता रोखण्यासाठी विधानसभेत विधेयक मंजूर केले

भाजपने 24 राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी घोषित केले जावडेकरांसह या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Road Accident : पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात, एक ठार

कार्ला -मळवली पुलावरून एक जण वाहून गेला, शोधण्याचे कार्य सुरु

अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी,17 जुलै रोजी सुनावणी

सर्व पहा

नवीन

केरळमध्ये 'मेंदू खाणाऱ्या' अमिबा संसर्गामुळे मुलाचा मृत्यू

Brain Eating Amoeba ने घेतला 14 वर्षाच्या मुलाचा जीव, जाणून घ्या किती धोकादायक आहे

1 रुपयात पीक विमा योजनेसाठी अर्ज करताय? मग आधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा

मुलींना लहान वयातच पाळी येणं धोकादायक का आहे? त्याची कारणं काय आहेत?

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था स्थिर, अर्थसंकल्पात दिलेल्या सवलती निवडणूक नौटंकी नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुढील लेख
Show comments