Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्या महत्वाचा प्रश्न आहे - शरद पवार

Webdunia
बुधवार, 23 मार्च 2022 (08:54 IST)
महाविकास आघाडी सरकार (च्या नेत्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे. पण ईडीची (ED) कारवाई आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकांपर्यंत यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. यामुळे राज्यातील राजकीय गटात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर  यांची ठाण्यातील संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार  यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सुमारे साडेसहा कोटी रुपये किंमतीचे त्यांची ११ फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले “सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा देशापुढील सध्या महत्वाचा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांना राजकीय सुडाच्या हेतूनं त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेण्यात आला आहे. पाच दहा वर्षांपर्यंत ईडीचं नाव कोणाला माहिती नव्हतं. पण आता तर गावागावांमध्ये ईडी पोहोचली आहे. या सर्व यंत्रणांचा सध्या दुर्दैवानं गैरवापर सुरु आहे. बघुयात आता याला काही पर्याय आहेत. पण त्यावर आता चर्चा न केलेली बरी.”

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments