Marathi Biodata Maker

आमदाराने केली संजय राऊत यांच्यावर खालच्या पातळीत टीका

Webdunia
मंगळवार, 5 जुलै 2022 (21:23 IST)
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची आणि अखेरीस शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आलं. शिवसेनेतील 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले. यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेला आहे. काल पर्यंत मांडीला मांडी लावून बसणारे आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.
 
यातच आता आणखी एका नवीन वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केली आहे. संजय राऊत बारा बापाचा नसेल तर राजीनामा दे असं आव्हान संजय गायकवाड यांनी केलं आहे. तसेच पुढे गायकवाड म्हणालेत संजय राऊत हे राष्ट्रवादीची सुपारी घेऊन शिवसेना संपवायला निघाले होते, ते असाही आरोप आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे. आता शिंदे गटातील आमदारांच्या मनात असलेला संजय राऊत यांच्या बद्दल सर्व अधिकच तीव्र होताना दिसत आहे.

सत्तांतराच्या नाट्यानंतर आमदार संजय गायकवाड बुलडाणा या आपल्या मतदारसंघात परतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांची संवाद साधला.
 
माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेचे आमदार नाराज असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आम्हाला निधी मिळू दिला नाही असे म्हणत उलट आमच्याच तक्रारी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या, त्यामुळे सर्वच आमदार व्यथित होते. असं संजय गायकवाड यांनी सांगितलं. तसेच आता सर्वत्रच शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला असताना या प्रश्नावरही त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत गायकवाड म्हणालेत शिवेसेनेचं धनुष्यबाण लवकरच आम्हाला मिळणार असून येत्या दोन ते तीन महिन्यात संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

एअर इंडिया संकटात; सीईओ कॅम्पबेल विल्सन यांचा राजीनामा

"आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती आहे," मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी घोषणा केली

रिक्षाचालकांवर लादलेल्या मराठी भाषेच्या आवश्यकतेवरून वाद, परवाना पडताळणीच्या आदेशामुळे चालक संतप्त

पंतप्रधान मोदींच्या बनावट सहीचा वापर करून ४ लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न; मुंबईत दोघांना अटक

LIVE: मुंबई सेंट्रल येथे ६० दिवसांच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर परिणाम होणार

पुढील लेख
Show comments