Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एकनाथ शिंदे गटातील आ.केसरकर ऑनलाईन पत्रकार परिषदेत म्हणाले, एकनाथ शिंदेंना नेते म्हणून उद्धव साहेबांनीच केले

Webdunia
शनिवार, 25 जून 2022 (21:34 IST)
गुवाहाटी : बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार दीपक केसरकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
 
ते म्हणाले, “आम्ही कोणीही शिवसेना सोडलेली नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच आहोत. उद्धव ठाकरे आमचे ऐकतील असा आम्हाला विश्वास आहे. एकनाथ शिंदेंना नेते म्हणून उद्धव साहेबांनीच केले आहे.
 
 
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंप सुरु आहे. बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदेच्या गोटात दाखल होत शिवसेनेलाच आव्हान दिले आहे. या सर्व बंडानंतर पहिल्यांदाच त्यांच्या गोटातील आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे पत्रकार परिषदेत घेत एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडली.
 
दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
-विधिमंडळात आम्हीच शिवसेना आहोत.
-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने शिवसेना हायजॅक केली होती.
-विधिमंडळात बहुमत सिद्ध करुन दाखवू.
-आम्ही नोटीशीला कायदेशीर उत्तर देऊ.
-बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मांडणारे आम्ही एकत्र आलो आहोत.
-एकनाथ शिंदे हेच आमच्या गटाचे नेते.
-बाळासाहेबांचं नाव वापरण्याबाबत काहीही मत झालेले नाही.
-शिवसैनिकांनी तोडफोड करु नये, त्यांनी कायद्याचे पालन करावं.
-उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचे कर्तव्य पूर्ण करावे.
-महाराष्ट्रात येणे सध्या सुरक्षित वाटत नसल्याने राजकीय परिस्थिती पूर्ववत झाल्यावर महाराष्ट्रात येऊ.
-कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये.
-ठाकरेंशी आम्ही चर्चा केली, पण काही उत्तर मिळाले नाही.
तसेच शिवसेनेने निवडलेल्या नेत्यांविरोधात आम्ही कोर्टात जाणार”, असा इशारा दीपक केसरकरांनी यावेळेस दिला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments