Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'आमदार-खासदार गेले, तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच'- संजय राऊत

Webdunia
शनिवार, 2 जुलै 2022 (13:41 IST)
"मुंबई महाराष्ट्रापासून भाजपला तोडायचीय. मुंबईवरची शिवसेनेची ताकद त्यांना नष्ट करायचीय. त्यासाठी तुम्ही (शिंदे गट) तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली दिलीय. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवून आणण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री केलंय," असं संजय राऊत म्हणाले.
 
"शिवसेनेच्या खासदारांच्या बैठक झाली. मी त्या बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. कारण त्याच वेळेला भाजपच्या एका शाखेनं (ईडी) बोलावलं होतं. मी नव्हतो, पण माझ्याकडे माहिती आली. खासदारांच्या भावनांवर चर्चा झाली. चर्चा होते, पण याचा अर्थ खासदार गेले असे होत नाही," असंही राऊत म्हणाले.
 
आमदार-खासदार गेले, तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
 
देवेंद्र फडणवीसांवर बोलताना संजय राऊत म्हणाले, "कुणाला आनंद होईल का? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना, दुसऱ्या क्रमांकाचं पद दिलं जातं आणि तेही जे मुख्यमंत्री झालेत, ते त्यांच्या मंत्रिमंडळात ज्युनियर मंत्री होते. पण भाजपमध्ये शिष्ट आणि आदेश यांचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागलं. त्यांचं कौतुक त्यासाठी,"
 
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी मिळून सरकार पुढे न्यावं. भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेनेतून फुटलेल्या गटाचं राज्य आलेलं आहे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना असं आम्ही मानतो. असं विधान शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत.
 
ते म्हणे, "एकनाथ शिंदेंच्या रुपाने या ना त्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे राहिलं आहे. जर शिवसैनिकांचा मान ठेवायचा होता तर मग नारायण राणेंना का पद दिलं नाही? त्यामुळे शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी म्हणणार नाही."
 
पक्षप्रमुख म्हणून ते उद्धव ठाकरेंना मानतात याचा आपल्याला आनंद आहे असं संजय राऊत म्हणाले.
 
या सरकारच्या कामकाजात राजकारण करणार नाही असं संजय राऊत म्हणाले.
 
काल जे उपमुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलंय ते अडीच वर्षांपूर्वी स्वीकारलं असतं तर एवढं झालंच नसतं असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

संबंधित माहिती

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

काळ बनले इयरफोन, दोन बहिणींचे मृतदेह मिळाले रेल्वे ट्रॅकवर

'जगामध्ये असे देश जास्त नाही आहे, जिथे....', अमेरिकेने भारताच्या लोकतंत्राला घेऊन दिला मोठा जबाब

महावितरण कर्मचाऱ्याकडून लाच मागितल्या प्रकरणात उप निरीक्षकावर गुन्हा दाखल

मुंबई : 16 लोकांच्या मृत्यू नंतर आता 8 मोठे होर्डिंग काढण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments