Festival Posters

मनसेचे सैनिक अयोध्येत दाखल

Webdunia
रविवार, 5 जून 2022 (12:21 IST)
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 5 जून अयोध्या दौरा करण्याचे जाहीर केले होते. त्यांचा दौरा उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या केलेल्या विरोधामुळे रद्द करण्यात आला.बृजभूषणसिंह यांचे म्हणणे होते की राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांचा अपमान केला असून त्यांना मारहाण करण्यात आली होती. 
 
त्यासाठी त्यांनी उत्तरभारतीयांची माफी मागावी.नाहीतर आम्ही राज ठाकरे यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. त्यामुळे त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला. नंतर त्यांची प्रकृतीअस्वस्थ झाल्यामुळे त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला असून सध्या त्यांना कोरोना झाल्याचे आढळले आहे.अयोध्या रद्द करण्याबाबतचे कारण राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेत सांगितले होते. 
 
राज ठाकरे यांचाआज 5 जूनचा अयोध्या दौरा काही कारणास्तव रद्द झाला पण त्यांचा दौरा पूर्ण केल्याचा दावा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. ते आज अयोध्येत असून त्यांनी सोशल मीडियावर अयोध्यातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
 
त्यात त्यांनी आज माननीय राजठाकरे साहेबांचा अयोध्या दौरा होता, तो काही कारणास्तव रद्द करण्यात आला पण त्यांच्या हा दौरा मनसेच्या सैनिकांनी पूर्ण केला असून मराठी माणसाचा स्वाभिमान जपला आहे. असं लिहिले आहे. त्यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओ मध्ये एक मराठी माणूस अयोध्येत आला असून त्याने रामल्लाचं दर्शन घेतलं आहे. प्रत्येक हिंदू आणि भारतीयांनी अयोध्येत येऊन रामल्लाचं दर्शन घेतले पाहिजे. असं म्हटले आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आदेशाचे पालन करत आहे का? शिक्षण विभागाने अहवाल मागवला

पुढील लेख
Show comments