Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

MNSचे अल्टीमेटम- 48 तासात भारत सोडा पाकिस्तानी अॅक्टर

Webdunia
शुक्रवार, 23 सप्टेंबर 2016 (14:32 IST)
उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावात राज ठाकरे यांची पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने धमकी दिली आहे की सर्व पाकिस्तानी ऍक्टर आणि कलाकार 48 तासात भारत सोडा. असे झाले नाही तर मनसेचे म्हणणे आहे की ते भारतात राहत असलेले पाकिस्तानिंना स्वत: हात पकडून बाहेर करतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांच्या चित्रपटांना रिलीज नाही होण्याची धमकी दिली आहे. यामुळे बर्‍याच चित्रपटांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.  
 
बर्‍याच कलाकारांची मुष्किल वाढणार आहे  
मनसे चित्रपत सेनाचे अमेय खोपकर यांनी म्हटले आहे की भारतात काम करत असलेले सर्व पाकिस्तानी कलाकारांनी लगेचच देश सोडायला पाहिजे. उरी अटॅक नंतर भारत पाकमध्ये तणाव वाढत आहे. या दहशतवादी हल्ल्यात 18 भारतीय सैनिक मरण पावले होते. भारत सरकारने उरी अटॅकसाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले आहे. अशात मनसेचा हा ऍलन बॉलीवूडमध्ये भाग्य अजमावणारे पाकिस्तानी कलाकारांची मुष्किल वाढू शकते.  
 
'रईस' आणि 'ऐ दिल है मुश्किल'ला रिलीज नाही होऊ देणार  
MNS ने म्हटले आहे की 'रईस' आणि 'ऐ दिल है मुश्किल' मूव्हीला भारतात रिलीज होऊ देणार नाही, कारण दोन्ही चित्रपटांमध्ये  पाकिस्तानी कलाकार सामील आहे. 'ऐ दिल है मुश्किल' करण जौहरचे चित्रपट आहे आणि 28 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. यात  पाकिस्तानी अॅक्टर फवाद खान आणि इमरान अब्बासने काम केले आहे. जेव्हा की रईस शाहरुख खान अभिनित चित्रपट आहे जी पुढील वर्षी 26 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात पाकिस्तानी एक्ट्रेस माहिरा खानने काम केले आहे.  
 
पहिले प्रकरण नाही  
हा काही पहिला मोका नाही आहे जेव्हा भारतात पाकिस्तानी कलाकारांना धमकी देण्यात आली आहे. या अगोदर शिव सेनाने गझल गायक गुलाम अली यांना मुंबईत आपला कार्यक्रम रद्द करण्यास मजबूर केले होते. भारत-पाकमध्ये टी-20 वर्ल्ड कपला घेऊन पक्षाने विरोध करण्याची धमकी दिली होती.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments