rashifal-2026

मगच मान्सून वेगाने सक्रीय होणार

Webdunia
अरबी समुद्रात पुढील २४ तासांत 'वायू' हे चक्रीवादळ वेगाने सक्रीय होणार आहे. मुंबईला 'वायू' चक्रीवादळाचा धोका नसला, तरी मुंबईत आणखी पावसाची शक्यता आहे. मात्र सर्वात महत्वाचे  म्हणजे, 'वायू' चक्रीवादळ शमल्यानंतरच, मान्सून वेगाने सक्रीय होणार आहे.वायू चक्रीवादळामुळे राज्यात मान्सूनला काहीसा उशीर होणार आहे, यामुळे पेरणी करण्याची घाई करू नये, प्रत्यक्ष मान्सून आल्यानंतर पेरणीचा विचार करावा, असं हवामान खात्यानं म्हटलंय. तर या दरम्यान विदर्भ-मराठवाड्यात आणि मध्य-महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.
 
सध्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह कमजोर आहेत. चक्रीवादळ शमल्यानंतर, मान्सूनचे वेगाने प्रगती करणार आहे. यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे, वादळ गेल्यानंतर मॉन्सून वेगाने प्रगती करत १३ जूनपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होणार आहे. मॉन्सूनच्या आगमनात राज्यात ३ ते ४ दिवसांची तफावत शक्य आहे. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनचे आगमन लांबणार आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार, युतीची अजित पवारांची मोठी घोषणा

IND W vs SL W : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथा T20 30 धावांनी जिंकला

ठाण्यातील एका महिलेने सहा जणांना जीवनदान दिले

मंत्री सरनाईक यांनी भाजप आमदार मेहता यांना 24 तासांचा अल्टिमेटम दिला

बारामतीत शरद पवार यांच्या हस्ते शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे उदघाटन, अदानी यांचे कौतुक केले

पुढील लेख
Show comments