rashifal-2026

मुंबई: अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नका Photo

Webdunia
मुसळधार संततधारेच्या रूपात मंगळवारी कोसळलेल्या वरुणराजाने मुंबईकरांची पुरती दाणादाण उडवली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेल्या रेल्वे वाहतुकीसह रस्ते वाहतूकही या वेळी ठप्प पडली आणि पाण्यात गेलेल्या मुंबईने पुन्हा एकदा मुंबईकरांना ‘२६ जुलै‘ची धडकीच भरली.

मुंबई-नागपूर दुरोंतो एक्स्प्रेसचे डबे सकाळीच घसरल्याने बाहेरगावी जाणाºया गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले होते. त्यात मुंबईत सकाळपासून जोर धरलेल्या पावसाने दुपारनंतर कहर सुरू केला. अवघ्या काही मिनिटांतच चहूबाजूंनी मुंबईला पावसाचा वेढा बसला. त्यात समुद्रात भरती असल्याने पाण्याचा निचरा थांबला. परिणामी, शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचू लागले. अखेर काही तासांतच मुंबईतील रस्ते वाहतूक ठप्प झाली. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत १०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
 
येत्या २४ तासांत मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच मच्छीमार बांधवांनीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन मंत्रालय, नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

शरद पवारांना मुंबईत मोठा धक्का : राखी जाधव भाजपमध्ये सामील, बीएमसी निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलली

मुंबई जिंकण्यासाठी दृढनिश्चयाने लढण्याचे उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

LIVE: मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये सामील

IND W vs SL W : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथा T20 30 धावांनी जिंकला

पुढील लेख
Show comments