Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंधेरी पूल दुर्घटनेस कोणीच कसे जबाबदार नाही?: मुंबई उच्च न्यायालय

Webdunia
पूल कोसळण्याची घटना असो वा चेंगराचेंगरीची दुर्घटना, अश्या घटनेची जबाबदारी घेण्यास कुणीही तयार होत नाही. मुंबई उच्च न्यायालयाने यावर खंत व्यक्त करत म्हटले की अशा वेळी राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासन सर्वच स्वतःची जबाबदारी झटकून मोकळे होतात.
 
पालिकेने पुलांचे ऑडिट केले नाही आणि मुंबईतील पूल कोसळत चालले आहेत. खरं म्हणजे मुंबई महापालिकेने सर्वच पुलांचे नियमित ऑडिट करून त्याचा अहवाल संबंधित प्रशासनांकडे पाठवायला हवा असेही न्यायालयाने म्हटले.
 
अंधेरी येथील काल पादचारी पूल कोसळून झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला तातडीने उपाय योजण्याचे आदेश देण्यात यावेत अशी विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्याची सुनावणी करत खंडपीठाने महापालिकेला सुनावले आणि नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्याचे काम मुंबई महापालिकेचे आहे म्हणून पालिकेने आपली जबाबदारी झटकू नये असेही खंडपीठ म्हणाले.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments