suvichar

मुंबईत पहिल्याच पावसात जीवनवाहिनी मंदावली

Webdunia
पावसाची वाट बघत असलेल्या मुंबईकरांना आजा मोठा दिलासा मिळाला आहे. शहरात आणि उपनगरात पावसाने हजेरी लावली. मात्र नेहमीप्रमाणे पावसामुळे वाहतूक सेवांवर परिणाम दिसून येत आहे.
 
धो-धो पावसामुळे मुंबईकर आनंदी झाले असले तरी अनेक ठिकाणी रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे ट्रॅफिकचा वेग मंदावला आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतून उशिराने धावत असल्यामुळे लोकांना त्रास सोसावा लागत आहे.
 
अनेक मार्गांवर ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झालेली आहे. हार्बर रेल्वे,  मार्गावरील वाहतूक पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहतूक सेवा सुमारे 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. इतर महामार्गावरही ट्रॅफिक खोळंबा आहे. तसेच नवी मुंबईच्या रस्त्यावर तीन फुटांपर्यंत पाणी साचलं असल्याची बातमी आहे.
 
तसेच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदानुसार पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईतल्या धारावी परिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरी, मुलुंड, ठाणे, दादर अशा अनेक भागात पाणी साचलं आहे. तसेच आज दिवसभर मुसळधार पाऊस येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जनगणनाच्या ३३ प्रश्नांमधून ओबीसी रकाना वगळल्याबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दिल्लीत आंदोलनाचा इशारा

Maruti Suzuki Cars Price Hike: कार खरेदी करायचीये? मग १ जूनआधीच घ्या निर्णय; ३० हजारांनी वाढणार किमती!

महाराष्ट्रातील गोतस्करांची आता खैर नाही; MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार

LIVE: भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट

भाजप आमदार प्रसाद लाड यांची जरांगे यांच्याशी भेट, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष आवाहन

पुढील लेख
Show comments