Festival Posters

मुंबईचा नवा महापौंर मुंबईकरांचे स्वप्न साकार करणार का ?

Webdunia
गुरूवार, 9 मार्च 2017 (12:11 IST)
अधिकारी बदलले कि, सूत्र देखील बदलतात. या बदलत्या सूत्रांचा परिणाम सामान्य नागरिकांवर आणि त्याबरोबरच शहरावर देखील होत असतो. राज्यात नुकत्याच झालेल्या  पालिका निवडणुकांचे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. खास करून  मुंबई शहराच्या आर्थिक उलाढाली सांभाळणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे सूत्र अनेक काळापासून निरंतर सुरु आहे. नुकतीच  विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या  महापौरपदी नियुक्ती झाली असून, त्यांचा नवा कार्यकाल शहराला लागू होणार आहे. अधिकाराची ही खांदेपालट सामान्य जीवनात कशापद्धतीने परिणाम करते, याचे वास्तव 'ट्रकभर स्वप्न' या आगामी सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

अभिनेते, चित्रपट- कलादिग्दर्शक, दिग्दर्शक तसेच निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले  नितीन चंद्रकांत देसाई लोकांना प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे देण्याचा  प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न त्यांनी 'ट्रकभर स्वप्न' या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. 

आयकॉनिक चंद्रकांत प्रॉडक्शन  प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली  सादर होणारा हा सिनेमा एका महत्वाकांक्षी तरुणाच्या जीवनावर भाष्य करतो.सरकारी खात्यातील बदलत्या नियमांची झळ सामान्य कुटुंबावर कशी पडते,यावर हा सिनेमा बेतला आहे. विशेष म्हणजे यात मकरंद देशपांडे प्रमुख भूमिकेत असून, क्रांती रेडकरची देखील एक महत्वपूर्ण व्यक्तिरेखा सिनेमात  आहे. प्रमोद पवार दिग्दर्शित हा सिनेमा सामान्य मुंबईकरांच्या भावना आणि त्यांच्या महात्वाकांक्षेवर आधारित आहे. स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांची हृदयस्पर्शी कथा मांडणारा  हा कौटुंबिक सिनेमा लवकरच सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

आसाममधील ब्रह्मपुत्र नदीत बोट उलटली, चार मुलांसह सहा जण बेपत्ता

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळादरम्यान प्रवास करणे सोपे होईल; फडणवीस सरकारने मेट्रो लाईन ८ ला मान्यता दिली

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप, काँग्रेस निवडणूक आयोगाकडे गेली

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आदेशाचे पालन करत आहे का? शिक्षण विभागाने अहवाल मागवला

पुढील लेख
Show comments