Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईची तुंबई होते, मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे ?

Webdunia
मंगळवार, 26 जून 2018 (17:20 IST)
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांचा सवाल
 
मुंबईत कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आज सकाळी अनेक भागात पाणी साचले होते. परिणामी मुंबईकरांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे मुंबईची तुंबई होत असेल तर मान्सूनसाठी सज्ज असण्याचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी उपस्थित केला आहे.
 
पुढे बोलताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. रेल्वेरुळालगतचा कचरा साफ करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, मात्र रेल्वे प्रशासान आणि पालिका प्रशासन ही जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. अशामध्ये मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण आहे असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.
 
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी साचले नसल्याचा अजब दावा केला आहे त्याला उत्तर देताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई पाणी साचले की नाही याचे उत्तर जनताच सत्ताधाऱ्यांना देईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धोकादायक आजार गुलियन-बॅरे सिंड्रोमचे लक्षणे काय आहे आणि खबरदारी काय घ्याल जाणून घ्या

भारतातील असे एक राज्य जिथे दिसत नाही कुत्रे आणि साप

त्वचेच्या अनेक समस्यांवर पनीरचे पाणी वापरा, जाणून घ्या वापरण्याची पद्धत

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

साप्ताहिक राशीफल 27जानेवारी 2025 ते 02-02-2025

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवारांनी केली शरद पवारांच्या तब्बेतीची विचारपूस

मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी पंकजा मुंडे जाणार

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जळगावला 730 कोटींचा निधी मंजूर

अजित पवारांनी शरद पवारांना फोन करुन तब्बेतीची विचारपूस केली

इस्रायलकडून युद्धबंदी कराराचे उल्लंघन, गाझा पट्टीवर गोळीबारात एक पॅलेस्टिनी ठार

पुढील लेख
Show comments