rashifal-2026

मुंबईची तुंबई होते, मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे ?

Webdunia
मंगळवार, 26 जून 2018 (17:20 IST)
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांचा सवाल
 
मुंबईत कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत आज सकाळी अनेक भागात पाणी साचले होते. परिणामी मुंबईकरांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे मुंबईची तुंबई होत असेल तर मान्सूनसाठी सज्ज असण्याचा दावा करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे काम आहे तरी कुठे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी उपस्थित केला आहे.
 
पुढे बोलताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई महानगरपालिकेचे अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहेत. रेल्वेरुळालगतचा कचरा साफ करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे, मात्र रेल्वे प्रशासान आणि पालिका प्रशासन ही जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे. अशामध्ये मुंबईत पाणी तुंबण्याला जबाबदार कोण आहे असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला.
 
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईत कुठेच पाणी साचले नसल्याचा अजब दावा केला आहे त्याला उत्तर देताना राखी जाधव म्हणाल्या की मुंबई पाणी साचले की नाही याचे उत्तर जनताच सत्ताधाऱ्यांना देईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

मनसेने रेल्वेला अल्टिमेटम दिला; रत्नागिरी पॅसेंजर चालवली नाही तर यूपी-बिहार ट्रेन थांबवण्यात येतील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना नवा किताब बहाल केला

अजित पवार यांचा विमान अपघात एक सुनियोजित कट; झिरो एफआयआरमध्ये दावा

LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्याची प्रशंसा केली

सरकारी आणि खाजगी शाळांचे ऑडिट होणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा

पुढील लेख
Show comments