Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नास नकार मुलीच्या आईवर सपासप वार करून केला खून

Webdunia
शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (15:16 IST)
लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून २३ वर्षीय युवकाने शेतात गवत आणायला गेलेल्या मुलीच्या आईवर खुरप्याने सपासप वार करून खून केल्याची घटना आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी अवघ्या ११ तासात खुनाचा उलगडा करत आरोपीला गजाआड केले आहे. लता महादेव परीट असं हत्या झालेल्या (वय ४२) महिलेचं नाव आहे.तर गुरुप्रसाद देवराज माडभगत असं अटक केलेल्या युवकाच नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुप्रसाद माडभगत याने काही दिवसांपूर्वी लता परीट यांच्या मुलीला लग्नासाठी मागणी घातली होती.पण लता परीट यांना विवाहस्थळ पसंत नसल्यानं त्यांनी मुलगी देण्यास नकार दिला होता. त्यामुळे गुरुप्रसाद लता यांच्यावर नाराज होता.लता आपल्या दोन्ही मुलांसह शुक्रवारी शेतात गवत आणावयास गेल्या होत्या.त्यानांतर शेतातील गवत कापून मुलांकडे देत, दोघांनाही घरी पाठवून दिलं.आणखी थोडं गवत कापून मीही येते असं त्यांनी मुलांना सांगितलं.शेतात लता एकट्याच असल्याचे पाहून गुरुप्रसादने खुरप्याने लता यांच्या तोंडावर,मानेवर रागानं बेभान होऊन अनेक वार केले.यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
शेतातून आई बराच वेळ झाला तरी न आल्याने मुलांनी आणि ग्रामस्थांनी लता यांची शोधाशोध सुरू केली. शोध घेत असताना जनार्दन देसाई यांच्या गावंधर नावाच्या शेतातील उसात लता यांचा मृतदेह आढळून आला.लता यांचा मृतदेह दिसू नये म्हणून तो गवतात आणि पाचटांन लपवून ठेवला होता.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ तपास सुरु केला.अवघ्या ११ तासांत घटनेची उकल करत गुरुप्रसाद याला अटक केली.त्याला आजरा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं असता,न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments