Festival Posters

लातुरातील ’स्टेप बाय स्टेप’क्लासचे संचालक चव्हाण यांची हत्या सुपारी देवून

Webdunia
मंगळवार, 26 जून 2018 (15:22 IST)
लातूर येथील क्लासचालक ’स्टेप बाय स्टेप’क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या कोणी केली हे समोर आले आहे. त्यांचा पूर्वीचा बिहारी पार्टनर ने सुपारी देवून यांची हत्या करवली आहे. ही हत्या त्याने क्लासच्या वादातून केली आहे हे स्पष्ट झाले आहे. मुख्य आरोपी चंदनकुमार शर्मा हा मूळचा बिहारमधील असून, गेल्या अनेक वर्षांपासून लातूर येथे राहत आहे. बी मॅक झालेला चंदनकुमार हा ‘कुमार मॅथ्स’ नावाने क्लास चालवत होता. या क्लासमध्ये जेव्हा चव्हाण शिकवायला येवू लागले तेव्हा विद्यार्थी संख्या अनेक पटींनी वाढली. मात्र पुढे आपला वेगळा मार्ग म्हणून चव्हाण यांनी त्यांचा वेगळा क्लास सुरु केला होता. यामुळे बिहारी कुमारला मोठा फटका बसला होता. याचा राग त्याने मनात ठेवत चव्हाण यांच्या हत्येची २० लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातून चव्हाण यांचा खून झाला आहे. चंदनकुमार शर्मा याने महेशचंद्र गोगडे रेड्डी याला अविनाश चव्हाण यांच्या हत्येची सुपारी दिली. महेशचंद्रने शरद घुमे याला हे काम सोपवले. शरद घुमेने त्याच्या गावात राहणाऱ्या करण सिंग घहीरवाल याला सोबत घेतले आणि अविनाश चव्हाणांवर गोळीबार केला आहे. लातुरातील प्रसिद्ध अशा ‘स्टेप बाय स्टेप’क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची 24 जूनच्या रात्री हत्या झाली. आपल्या घराकडे जात असताना शिवाजी शाळेजवळ त्यांच्या गाडीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. यात एक गोळी त्याच्या उजव्या छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. लातूर शहरात सुमारे 100 शिकवण्या सुरु झाल्या आहेत. नियमित आणि पुन्हा परीक्षा देणारे असे 25 हजार विद्यार्थी या शहरात शिकतात. तीन विषयांसाठी मिळून प्रत्येक विद्यार्थ्याला 50 हजार फिस द्यावी लागते. त्यातून सुमारे 1200 कोटींचा व्यवहार या जिल्ह्यात होतो आहे. हा क्लासचा आर्थिक वाद किती मोठा आहे हे दिसून येते आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments