Festival Posters

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प रत्नागिरीत नाही राहणार

Webdunia
बुधवार, 19 जून 2019 (16:27 IST)
राज्यातील बहुचर्चीत व वादात अडकलेला सोबतच स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असलेला नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प (Nanar refinery project) आता कोकणातील रत्नागिरीतून रायगड जिल्ह्यात हलवण्यात येणार आहे. नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडला स्थलांतरित करण्याबाबत स्थानिकांचा विरोध नाही, असं लेखी उत्तर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिल आहे त्यामुळे मोठ्या राजकीय वादाला विराम मिळाला आहे. येथील 40 गावातील ग्रामस्थांचा प्रकल्पाच्या भूसंपादनाला कोणताही विरोध नाही. तर अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन येथील 40 गावं प्रकल्पाच्या बाजूने आहेत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिकांच्या आणि राजकीय विरोधामुळे नाणार रत्नागिरी येथून तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडला हलवल्याचं मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर सांगितले आहे. कोकणातील निसर्गसंपन्न रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या सीमेवर नाणार तेलशुद्धीकरण (रिफायनरी) प्रकल्प प्रस्तावित होता. मात्र या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा जोरदार विरोध केला, त्यामुळे शिवसेनेने मुद्दा लावून धरला होता. शिवसेनेने भाजपसोबत युती करताना नाणार रद्द करण्याची अट ठेवली होती. ही अट भाजपकडून मान्य करण्यात आली आहे. तर 2 मार्च 2019 रोजी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या अखेरच्या फाईलवर सही केली होती. त्यामुळे आता मोठ्या वादावर पडदा पडला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

हिंदी विरुद्ध मराठी राजकारण तीव्र, बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपने हिंदी भाषिक मतपेढीवर लक्ष केंद्रित केले

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

मार्चमध्ये ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का? पीआयबीने सत्य उघड केले

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

मुंबईत प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला

पुढील लेख
Show comments