Marathi Biodata Maker

नागपूर अधिवेशनात सरकारचे वस्त्रहरण करू : राणे

Webdunia
मंगळवार, 25 ऑक्टोबर 2016 (11:14 IST)
राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचा बट्टय़ाबोळ केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने दिलेली आरक्षणे काढून जाती-पातीत तेढ निर्माण करण्याचे काम सरकार करत आहे; मात्र, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारला सळो की पळो करून पुरते वस्त्रहरण करणार आहे, असा कडक इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी रविवारी दिला. 
 
शहर काँग्रेसमार्फत दापोडी येथे रविवारी पिंपरी ब्लॉक कार्यकर्ता मेळावा आणि राणे यांची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी राणे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या जाहिरातबाजीचा पंचनामा केला. यावेळी हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत छाजेड, प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
राणे म्हणाले, मंत्रिमंडळाला जनतेच्या हिताची अथवा जबाबदारीची जाणीव नाही. वर्षभरापासून 38 ते 40 हजार कोटींच्या विकास योजना सरकारने बंद केल्या. जलशिवार योजनेची कामे जनतेच्या पैशांमधून झाली. राज्यातील 14 मंत्री भ्रष्टाचारी असल्याचे पुरावे दिले; परंतु, मुख्यमंर्त्यांनी त्यांना क्लीन चिट देण्याचे काम केले. मेक इन महाराष्ट्र अंतर्गत घोषित 8 लाख कोटींपैकी 1 लाख कोटी रुपयांच्या उद्योगांचे दहा प्रस्ताव आले आहेत. शिक्षकांवर पोलिसांकरवी लाठीमार करून गुंडांना हार घालून पक्षप्रवेश दिला जात आहे. विरोधकांच्या कुंडल्या तयार करण्याची भाषा केली जात आहे. सरकारच्या बेबंदशाहीमुळे अधिकारी बेभान झाले आहेत.
 
हर्षवर्धन पाटील म्हणाले, कोण म्हणते काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार. आज ज्यांना रुचत नाही, तेच आघाडीची भाषा करत आहे. पक्षातील काही स्वार्थी माणसे जिथे सत्ता आहे, तिथे जातात. आयाराम-गयारामचे आणि गुंड-पैसा आणि सत्तेच्या जीवावर सत्ताप्राप्तीचे दिवसही सरले आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या लबाडांना पुन्हा पक्षप्रवेश दिला जाऊ नये. विधानपरिषदेसाठी आघाडी झाली नाही, तर ‘अकेला चलो रे’चा नारा घेऊन पुढे जाऊ.
 
चंद्रकांत छाजेड, कविचंद भाट, कैलास कदम यांनीही विचार मांडले. बाळासाहेब साळुंके यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रास्ताविक केले.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

LIVE: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले

Maharashtra kesari 2026 : पुण्यात महाराष्ट्र केसरी साठी 1500 मल्ल भिडणार

इराण-इस्रायल युद्धामुळे हापूस आंबा निर्यात धोक्यात, कोकणातील शेतकऱ्यांची चिंता

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले, जनहित याचिका दाखल

सोलापुरात एसआरपीएफ जवानाची आत्महत्या, पत्नीच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments