Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय, राणे यांची खोचक टीका

Webdunia
गुरूवार, 10 सप्टेंबर 2020 (08:56 IST)
‘बोल्याप्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री कंगना मुंबईत दाखल झाली. तिच्या घरी देखील गेली. तिने प्रतिक्रियाही दिली आणि शिवसेनेचं नाक कापलं. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था आहे का? हा माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे. कंगना जर मुंबई महाराष्ट्राचा अपमान करत असेल, तर कायद्यात तरतूद आहे, कारवाई करा. मुख्यमंत्री मातोश्रीच्या पिंजऱ्यात कशाला बसलाय,’ अशी खोचक टीका भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.
 
‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. मात्र, त्या अधिवेशनाला काहीही अर्थ नव्हता. या अधिवेशनात आरक्षणासह इतर महत्त्वाचे मुद्दे घेण्यात आलेले नाही. त्यामुळे घेण्यात आलेले अधिवेशन पटलेले नसून हे अधिवेशन घेतले नसते तरी चालेल असते. त्यामुळे पुढील अधिवेशन घेण्याची वेळ आलीच तर अडीच तासाचे अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या’, असे म्हणत  राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला केला आहे.
 
राज्य सरकार हे मराठा आरक्षण देण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतं. त्यामुळेच त्यांनी सुप्रीम कोर्टात नामांकित वकील दिले नाहीत. राज्य सरकारने नात्या-गोत्यातले साधे वकील उभे केले. चांगला वकील सुप्रीम कोर्टात दिला नाही, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे,’ अशी टीका नारायण राणे यांनी केली. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments