Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून..-जयंत पाटील

jayant patil
, शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (22:18 IST)
शिवसेनेच्या वरच्या फळीतील नेते एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या साथीने बंडखोरी केली. त्यानंतर त्यांना शिवसेनेच्या एकूण ५० आमदारांची साथ मिळाल्याने, महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. सध्या प्रत्येक पक्षाच्या सुरू असलेल्या विविध हालचाली या सत्तास्थापनेच्याच आहेत. पण याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. सत्तेपेक्षाही लोकशाही टिकवणे जास्त महत्त्वाचे असल्याची पक्षाची भूमिका त्यांनी मांडली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डॉक्टर सेल गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक नवनवीन उपक्रम राबवून मावळते प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी ही संघटना वाढवली. आता डॉ. सुनील जगतापही त्याच जोमाने काम करतील असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. याच कार्यक्रमात जयंत पाटीला म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे. डॉक्टर, वकील हे शिक्षित वर्ग लोकांचे मत परिवर्तन करू शकतात.

Edited By - Ratandeep Ranshoor 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत