Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जमिनीच्या वादातून पुतणीची हत्या

Webdunia
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (16:50 IST)
शेतजमीनीवरुन सख्ख्या भावाशी झालेल्या वादात चार वर्षीय पुतणीला नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडली आहे. ज्ञानदा यशोधन धावणे असे मृत चिमुकलीचं नाव आहे तर आरोपी काका यशोदीप धाकणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मोहोळ तालुक्यातील डिकसळ येथील रहिवासी यशोधन शिवाजी धावणे यांची वडिलोपार्जित 16 एकर शेतजमीन यापैकी पाच एकर त्यांच्या नावे, पाच एकर भाऊ यशोदीपच्या नावे तर उर्वरित सहा एकर जमीन आईच्या नावे आहे. आईच्या नावावर असलेली सहा एकर शेतजमीन ही आपल्या नावावर करावी यावरुन आरोपी सातत्याने भांडण करत होता.
 
याच कारणावरुन 20 फेब्रुवारी रोजी दोन्ही भावांमध्ये पुन्हा भांडण झाले. त्यानंतर चिमुकल्या ज्ञानदाचे वडील यशोधन हे आई आणि पत्नीसह शेतात गेले. काही कामानिमित्त घरी परतल्यानंतर घरात मुलगी आणि वडील दोघे घरात न दिसल्यामुळे चौकशी केल्यास वडील मंदिरात दर्शनासाठी गेले होते तर ज्ञानदा घरात झोपलेली असल्याचे सांगितले. मात्र मुलगी घरात नसल्याने त्यांनी आसपास चौकशी केली तेव्हा भाऊ यशोदीप ज्ञानदाला गाडीवर घेऊन गेल्याचे लोकांनी सांगितले. भावाला फोन लावल्यानंतर त्याने पुतणीला मलिकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिल्याचे सांगितले.
 
यशोधन यांनी तात्काळ मालिकपेठला धाव घेतली तर नदी पात्रात ज्ञानदा पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आहे. चिमुकलीला उपचारासाठी रुग्णालयात आणले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

पुढील लेख
Show comments