Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी नवीन नियमावली

Webdunia
शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (10:56 IST)
दीर्घ काळापासून कोरोना संकटाचा सामना करत असलेल्या महाराष्ट्र सरकारने तिसऱ्या लाटेच्या धोक्यात कडकपणा वाढवला आहे. यामुळे इतर राज्यांतून येणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस किंवा नकारात्मक अहवाल असणं .इतर राज्यातून येणाऱ्यांसाठी अनिवार्य.
 
दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर सहन करणाऱ्या महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेपूर्वी कठोर पावले उचलली आहेत. आता इतर राज्यातून येथे येणाऱ्यांना कोरोना लसीच्या दोन्ही लसी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. जर त्यांनी लसीकरण केले नाही, तर त्यांना नकारात्मक RTPCR अहवाल दाखवावा लागेल.जर असे नसेल तर त्याला 14 दिवसांसाठी क्वारंटाईन मध्ये ठेवणे आवश्यक आहे. 
 
इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना आता कोरोना लस घेतल्याच्या पुरावा म्हणून लस प्रमाणपत्र जवळ बाळगावे लागणार. महाराष्ट्र सरकारच्या नवीन आदेशात असे म्हटले आहे की बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना दोन्ही लसी घेणे आवश्यक आहे, दुसरी लस घेणे 14 दिवसांसाठी बंधनकारक असेल.जर एखादा प्रवासी या नियमांचे पालन करत नसेल तर त्याला कोरोनाचा नकारात्मक आरटी पीसीआर अहवाल दाखवावा लागेल. तो अहवाल देखील 72 तास जुना असावा. 
 
राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे की ,जर एखाद्या कडे कोरोना लस घेतल्याचा पुरावा नाही,आरटीपीसीआरचे अहवाल देखील नाही.तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार.असं करणं बंधन कारक आहे. 
 
महाराष्ट्र सरकार यावेळी इतकी कठोरता दाखवत आहे कारण राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती आहे. दुसऱ्या लाटेत राज्याने कोरोनाचे भीषण रूप पाहिले आहे.आणि तिसऱ्या लाटेत साथीच्या रोगाला सामोरी जावे लागू नये म्हणून उद्धव ठाकरे सरकार आधीच सतर्क झाले आहे.

संबंधित माहिती

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

गुजरातमध्ये 4 ISIS दहशतवाद्यांना अटक, ATS तपासात गुंतली

छत्तीसगडच्या कवर्धामध्ये पिकअप दरीत कोसळली, 18 मजुरांचा मृत्यू

12वीचा निकाल उद्या लागणार

IPL 2024: पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा सामना कोलकाताशी

स्मृति इराणी यांनी गौरीगंजमध्ये केले मतदान, विकसित भारत संकल्प आणि महिला कल्याणासाठी टाकले मत

समुद्रात संपले नावेचे इंधन, भारतीय तटरक्षक दलाने वाचवले 26 लोकांचे प्राण

नाइट्रोजन पान खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलीच्या पोटात झाले छिद्र

पुढील लेख
Show comments