Marathi Biodata Maker

लवकरच पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरु होणार : आदित्य ठाकरे

Webdunia
बुधवार, 3 फेब्रुवारी 2021 (07:37 IST)
कोरोनानंतर लवकरच पुन्हा एकदा नाईटलाईफ सुरु होणार अशी घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांनी केली आहे. त्यामुळे ‘मिशन बिगीन अंतर्गत हळूहळू सर्व बाबी सुरु केल्या, त्यामुळे नाईटलाईफ देखील लवकरच सुरु करु, रेस्टॉरंटही रात्री एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत २६ जानेवारी २०२० रोजी नाईट लाईफची सुरुवात झाली. मात्र कोरोनामुळे ही नाईट लाईफ योजना कुठेतरी बारगळी. मात्र आता पुन्हा मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्यासाठी आदित्य ठाकरे सरसावले आहेत.
 
याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आता आपण रेस्टॉरंटला 1 पर्यंत सुरु करण्याची परवानगी दिली आहे. हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत, अजूनपर्यत तरी कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे नाईट लाईफ देखील लवकरच सुरू करू” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी रेस्टॉरंटना रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्याला परवानगी देण्यात आल्याच्या निर्णयालाही अधोरेखित केलं.
 
मुंबईत २६ जानेवारी २०२० पासून मुंबईत नाईट लाईफला सुरुवात झाली. त्यानंतर मुंबईत बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले ठेवण्याची त्यात परवानगणी देण्यात आली होती. हे सर्व त्यावेळी प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आले होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

एलन मस्क म्हणाले की व्हॉट्सॲपवर विश्वास ठेवता येणार नाही

Badminton Asia Championships 2026 भारतीय बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने जोनाथन क्रिस्टीला पराभूत केले

वैभव आणि जुरेल यांच्या वादळी अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने बंगळूरवर ६ गडी राखून विजय मिळवला

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या चिमुकल्याला जन्मदात्या आईनेच प्रियकरासोबत मिळून दिला भयानक मृत्यू

नितीश कुमार यांनी बिहार सोडण्याची घोषणा केली; या निर्णयाने सर्वांना आश्चर्याचा धक्का

पुढील लेख
Show comments