Festival Posters

१ जुलैपासून ‘आधार’ नाही तर रेशनही नाही

Webdunia
सोमवार, 22 मे 2017 (10:50 IST)
‘ज्या कुटुंबातील एकही लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक नसेल, अशा कार्डावर यापुढे रेशनचे धान्य दिले जाणार नाही. १ जुलैपासून हा निर्णय अंमलात येणार आहे’, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके यांनी दिली. राज्यात ईपीडीएस या प्रणाली अंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण संगणीकीकरण झाल्याचे नरके यांनी सांगितले.
 
अन्न पुरवठा विभागाने याची प्रभावी अंमलबजावणीचे आदेश आज राज्यातील पुरवठा अधिकार्‍यांना दिले. पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी राज्याच्या ईपीडीएस प्रणालीचा आढावा घेतला असता यावेळी हे आदेश देण्यात आले.
 
जिल्हा पुरवठा अधिकारी नरके म्हणाल्या, ‘ईपीडीएस प्रणालीत नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. यात सर्व रेशन कार्डधारकांचा तपशील नोंदवला आहे. सुमारे ९२ टक्के आधार लिंक झाले आहे. आता यासंदर्भात अधिसूचना आली आहे. एखाद्या कुटुंबातील एकाही व्यक्तीचे आधार लिंकिंग झाले नसेल, तर संबंधित रेशनकार्ड हे बोगस ठरविले जाणार आहे. त्यावरील सर्व लाभ बंद होणार आहेत.’
 
सध्या आधार कार्डातील ओळख पटविण्यात ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहेत. अशा कार्डावर धान्य दिले जात असले तरी तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी सॉप्टवेअरमध्ये हा सर्व डाटा भरण्यात येत असून आधार लिंकचा डाटा आणि पुरवठा विभागाकउे प्राप्त डाटा पडताळणी करण्यात येणार असल्याचेही नरके यांनी सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला

रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप

अजित पवारांची स्वप्ने पूर्ण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी, सुनील तटकरे यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा जागांसाठी संपर्क प्रमुखांची घोषणा केली

मंत्री नरहरी झिरवाल यांचा व्हायरल व्हिडिओ बनावट असल्याचे निष्पन्न! मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; तृतीयपंथी व्यक्तीच्या भावावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments