Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्यांच्या असण्या-नसण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही

Webdunia
शनिवार, 14 डिसेंबर 2019 (13:22 IST)
ज्या व्यक्तीला आपला मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्या असण्यानसण्याने पक्षाला काहीच फरक पडणार नाही, असा हल्लाबोल भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पंकजा मुंडेंवर केला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्ताने परळी येथील गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यात पंकजा यांनी अप्रत्क्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. तसेच मी पक्ष सोडणार नाही, पण पक्षाने मला सोडावे का नाही, हा त्यांचा प्रश्न असल्याचे म्हटले. यावरुन काकडे यांनी पंकजा यांचा समाचार घेतला.
 
ते म्हणाले, पंकजा यांच्या कालच्या मेळाव्याला फारशा गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पुढे ते म्हणाले, पाच वर्षे मंत्री असूनही तिथल्या लोकसभेची खासदारकी कुटुंबात असूनही जी व्यक्ती 30 हजार मतांच्या फरकाने पराभूत होते. चाळीस वर्षे राजकारणात असूनही ज्यांना मूठभर मतदारसंघ सांभाळता आला नाही, त्यांच्यामुळे भाजपला काहीही फरक पडणार नाही. पंकजा यांनी कोणालाच जवळ केले नाही. मराठा समाज, मुस्लीम समाज, ओबीसी समाज त्यांच्यावर नाराज होता. त्यामुळेच ते पराभूत झाल्या आहेत. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments