Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आदिवासींकडून पाणी फाउंडेशनच्या कामाला विरोध

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2019 (16:51 IST)
नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातल्या मतेवाडी येथे आदिवासींनी पाणी फाउंडेशनच्या कामाला विरोध करत जारदार हल्ला केला आहे. या हल्ल्यात 10 ते 12 गावकरी जखमी झाले असून, पाणी ८ ते ९ गाड्या जाळल्या असून तसेच जेसीबीची तोड फोड करून चालकांना जबर मारहाण केली आहे. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्या आले आहे. 
 
या घटनेत शुक्रवारी सकाळी 6 वाजताच येथील गावकऱ्यांनी काम सुरू केले. काम सुरू झाले मात्र येथे वास्तव्य करणाऱ्या आदिवासींनी ही जमीन आपण कसत असल्याचे सांगत कामाला विरोध केला. यावेळी आदिवासींनी पाणी फाउंडेशनच्या कामगारांवर गलोल आणि गोफणीने जोरदार हल्ला तरत कामगारांच्या 9 गाड्या जाळल्या. तसेच तेथील जेसीबीची तोड फोड करून दोन जेसीबी चालकांनाही जबर मारहाण केली. आदिवासींच्या हल्ल्यात भाऊराव चव्हाण, जिजाबाई चव्हाण, सुरेखा मते, संतोष मते, सागर कावळे यांच्यासह इतर कामगार जखमी झाले आहेत. तर जेसीबी चालक मोंटू प्रमाद आणि मुन्ना शहा हे दोघे गंभीर जखमी आहेत.

संबंधित माहिती

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

मेक्सिकोच्या चियापासमध्ये झालेल्या गोळीबारात 11 जण ठार

T20 World Cup : बांगलादेशने T20 विश्वचषक 2024 साठी संघ जाहीर केला

IPL 2024 मध्ये एक नवा विक्रम रचला,पहिल्यांदाच इतके षटकार लागले

CAA: CAA अंतर्गत 14 लोकांना दिले नागरिकत्व प्रमाणपत्र,गृह मंत्रालयाची माहिती

लोकसभा निवडणूक 2024:उद्धव ठाकरेंना मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे म्हणत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला

अफगाणिस्तानच्या पूरग्रस्तांसाठी कतारने मदत सामग्री पाठवली

दिंडोरी सभेत पंतप्रधान मोदींनी केला राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा दावा

15 वर्षांच्या मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, प्रेयसीसाठी पत्नीला सोडले होते

पुढील लेख
Show comments