Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील'- तुषार भोसले यांचे अजित पवारांना आव्हान

अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील - तुषार भोसले यांचे अजित पवारांना आव्हान
Webdunia
रविवार, 13 जून 2021 (10:36 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया 
आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नसून हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजप प्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला आहे.
 
मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदा पायी वारीला परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने वारी करण्यास परवानगी दिलेली नाही.
हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, अशी टीकाही तुषार भोसले यांनी केलीय. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
राज्य सरकारने आपली भूमिका मागे घेतली नाही तर असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला उमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील असं आव्हान तुषार भोसले यांनी दिलं आहे.
 
राज्यातील मानाच्या दहा पालख्यांसाठी बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

रेल्वे ट्रॅकवर आढळला महिला आयबी अधिकाऱ्याचा मृतदेह

राष्ट्रगीताचा 'अनादर' केल्याबद्दल मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरुद्ध खटला दाखल, आज न्यायालयात सुनावणी

पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का बसून अल्पवयीन मुलाचा मृत्यू, कंत्राटदाराला अटक

LIVE: गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात वाघ आणि बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू

मुंबई: निवासी इमारतीला भीषण आग, सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments