Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालघर: 'पप्पा 30 हजार पाठवा, मला मारुन टाकतील, म्हणत अपहरणाचा बनाव रचला

Webdunia
सोमवार, 11 डिसेंबर 2023 (20:52 IST)
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक धक्कादायक अन् तितकीच चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाला त्याच्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी अपहरण केल्याचा बहाणा करून अटक करण्यात आली आहे. वडिलांपासून पैसे घेण्यासाठी 20 वर्षीय मुलानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील फादरवाडी भागातील हे प्रकरण आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  
 
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसईतील फादरवाडी भागातील 20 वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसात केली होती. त्यांचा मुलगा 7 डिसेंबरला घरातून निघून गेला जो पुन्हा परत आला नसल्याचे या तक्रारीत म्हणले होते. तसेच मुलाने त्यांना फोन करुन अपहरण झाल्याचेही सांगितले होते.
 
दरम्यान मुलाने वडिलांना फोन करुन "तीन जणांनी माझे अपहरण केले आहे. ते 30 हजार रुपयांची मागणी करत आहेत. खंडणी दिली नाही तर मला मारुन टाकतील..." असे म्हणत एक QR कोडही पाठवल्याचे त्यांनी या पोलिस तक्रारीत म्हणले होते.
 
या तक्रारीनंतर मुलाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आणि वसई, विरार, नालासोपारा आणि इतर ठिकाणी मुलाचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी शनिवारी (9, डिसेंबर) वसई फाटा येथून या मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. ज्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला.
 
मुलाला त्याची गाडी दुरूस्त करण्यासाठी वडिलांकडून पैसे हवे होते. मात्र वडील पैसे द्यायला तयार नव्हते. त्यामुळेच हा सगळा अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
 
दरम्यान, मुलाने पाठवलेला क्युआर कोड ओळखीचा वाटल्याने वडिलांना संशय आला. ज्यामुळे त्यांनी पैसे न पाठवता पोलिसांत तक्रार दाखल केली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनने अख्खा भारत व्यापला, जुलैत पाऊस कसा असेल? जाणून घ्या

Weather News : राज्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे मतदारांना आवाहन

डोनाल्ड ट्रंप यांना कॅपिटल हिल दंगलप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दिलासा, न्यायालयाने काय म्हटलं? वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

सर्व पहा

नवीन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

भारत न्याय संहिता लागू; यापुढे जुन्या IPC कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांवर काय परिणाम होतील?

पुढील लेख
Show comments