Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विठ्ठल- रूक्मिणी मंदिराचे प्राचीन स्वरूप होतेय नष्ट

Webdunia
पंढरपूर- भारतीय पुरातत्व विभागाकडून देशातील सर्व मंदिरे प्राचीन पद्धतीची राहवीत, यासाठी प्रयत्न हो आहेत. मात्र, विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या हेमाडपंथी मंदिराला चक्क आधुनिक पद्धतीची रंगरंगोटी करून मंदिराचे प्राचीन स्वरूप नष्ट करण्याचा प्रकार मंदिर समितीकडून होत आहे.
 
विठ्ठल- रूक्मिणीमातेचे मूळ मंदिर 5 हजार वर्षांपूर्वीचे आहे. विठ्ठलाचा चौखांबी परिसर 700 वर्षांपूर्वीचा, गरूड खांब परिसर 300 वर्षांपूर्वीचा व विठठ्लाचा सभामंडप यादवकालीन 150 वर्षांपूर्वीचा आहे. हा प्राचीन ठेवा जसाच्या तसा राहवा यासाठी शासनाकडूनदेखील प्रयत्न होत आहेत. तसेच विठ्ठलमूर्तीची झीज होऊ नये, यासाठी पुरातत्व विभागाकडून अनेक वेळा मंदिर समितीने मूर्तींची तपासणी करून घेतली आहे.
 
मंदिराला अनेक ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिराचे प्राचीन स्वरूप नष्ट होत होते. ते होऊ नये म्हणून पुन्हा औरंगाबाद येथील पुरातत्व खात्याकडून मंदिर समितीने मंदिराची स्वच्छता करून घेतली. मात्र, आषाढी वारी सोहळ्यासाठी मंदिर परिसरातील इतर ठिकाणांची रंगरंगोटी करताना मंदिर समितीने विठ्ठलाचे गर्भगृह व चौखांबी यांच्यामधील हेमाडपंथी मंदिराच्या भागाला रंगरंगोटी केली आहे. यामुळे मंदिर समितीकडून मंदिराची देखभाल व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

गद्दार ते गद्दारच, कुणालने काहीही चुकीचे बोलले नाही- उद्धव ठाकरेंचे विधान समोर आले

जर घरे पाडली तर आम्ही घरात घुसून मारहाण करू, नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नरेंद्र पाटील यांचा इशारा

LIVE: राहुल गांधी आणि कामरा दोघांनीही संविधान वाचलेले नाही, शिंदेंवरील टिप्पणीवर मुख्यमंत्री संतापले

'जर त्यांनी भाजपचा पर्दाफाश केला तर...', सुशांत प्रकरणात संजय राऊत म्हणाले- उद्धव यांनी नारायण राणेंना फोन केला नाही

Kunal Kamra's Controversy जे अधिकारात आहे चे बोलले पाहिजे- कुणाल कामराच्या वादग्रस्त गाण्यावर अजित पवार काय म्हणाले?

पुढील लेख
Show comments