Dharma Sangrah

आई वडीलांची 12 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (16:13 IST)
एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षांच्या मुलीसह वैनगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातील आंभोरा येथे मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी तिघांनी एकमेकांच्या हाताला ओढणीने बांधून घेतले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
 
श्याम गजानन नारनवरे (वय 46) सविता श्याम नारनवरे (वय 35) आणि कु. समिता समीक्षा श्याम नारनवरे (वय 12) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी होते. श्याम नारनवरे हे संत जगनाडे महाराज कोऑपरेटीव्ह सोसायटीत रोखपाल असल्याचे समोर आले आहे.
 
वेलतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैनगंगा नदी पात्राजवळ दुचाकी उभी असल्याने काही तरी दुर्घटना घडल्याचे गावक-यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. तिघांचे मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले होते, तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला. तिघांचे हात एकमेकांना ओढणीने बांधले होते. त्यामुळे ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. श्याम नारनवरे हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते असे समजते. या प्रकरणी वेलतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

पश्चिम रेल्वे १५० विशेष गाड्या चालवणार, बहुतांश मुंबईहून सुटणार

LIVE: रूपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा सामना घरच्या मैदानावर केकेआरशी होईल

मुंबई लोकल ट्रेनमध्ये १५ डबे असणार? शिंदे-ठाकरे गटाच्या खासदारांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना आवाहन केले

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार

पुढील लेख
Show comments