Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई वडीलांची 12 वर्षांच्या मुलीसह आत्महत्या

Webdunia
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (16:13 IST)
एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षांच्या मुलीसह वैनगंगा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातील आंभोरा येथे मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी तिघांनी एकमेकांच्या हाताला ओढणीने बांधून घेतले होते. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
 
श्याम गजानन नारनवरे (वय 46) सविता श्याम नारनवरे (वय 35) आणि कु. समिता समीक्षा श्याम नारनवरे (वय 12) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. हे दाम्पत्य वाठोडा येथील अनमोल नगरचे रहिवासी होते. श्याम नारनवरे हे संत जगनाडे महाराज कोऑपरेटीव्ह सोसायटीत रोखपाल असल्याचे समोर आले आहे.
 
वेलतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैनगंगा नदी पात्राजवळ दुचाकी उभी असल्याने काही तरी दुर्घटना घडल्याचे गावक-यांच्या लक्षात आले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. तिघांचे मृतदेह जेव्हा बाहेर काढण्यात आले होते, तेव्हा सर्वांना एकच धक्का बसला. तिघांचे हात एकमेकांना ओढणीने बांधले होते. त्यामुळे ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. श्याम नारनवरे हे गेल्या काही दिवसांपासून तणावात होते असे समजते. या प्रकरणी वेलतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments