Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कराची थकबाकी असलेल्या नागरिकांसाठी महापालिका अभय योजनेअंतर्गत आठ दिवसात दीड कोटींचा भरणा

Webdunia
गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (08:30 IST)
कराची थकबाकी असलेल्या नागरिकांसाठी जळगांव महापालिका प्रशासनाकडून अभय योजना राबविण्यात येत आहे. या योजनेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आठ दिवसात तब्बल १ कोटी ६९ लाख रुपयांचा भरणा नागरिकांकडून करण्यात आला आहे.
 
मालमत्ता कराचा भरणा वाढवून मनपाच्या कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून अभय राबविण्यात आली होती होती. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापर्यंत सूट देण्यात येत होती. या योजनेला उत्तम प्रतिसाद लाभल्याने ही योजना पुन्हा कार्यान्वित करावी, अशी मागणी महापौर जयश्री महाजन यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती. दरम्यान, प्रशासनाकडून दि.१५ नोव्हेंबर २०२१ पासून ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान भरणा केल्यास शास्तीमध्ये ९० टक्के सूट, दि.१५ ते ३१ डिसेंबरपर्यंत भरणा केल्यास शास्तीत ७५ टक्के तर दि.१ ते १५ जानेवारी २०२२ पर्यंत भरणा केल्यास शास्तीत ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.
 
अशी आहे प्रभागनिहाय वसुली
अभय योजनेअंतर्गत आठ दिवसात १ कोटी ६९ लाख ७४ हजार ९८१ रुपयांची वसूली झाली आहे. यात प्रभाग क्रमांक १ मध्ये ४७ लाख ५ हजार ३०६ रुपये, प्रभाग क्र. २ मध्ये ३६ लाख १४ हजार ६७० रुपये, प्रभाग क्र. ३ मध्ये ५२ लाख ५० हजार ९४६ तर प्रभाग क्र.४ मध्ये ३४ लाख ४ हजार ५९ रुपयांची वसूली करण्यात आली आहे.
 

संबंधित माहिती

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

प्राचार्यांनी आयुषला गटारात फेकले, त्याला दुखापत झाली तर रक्त पाहून घाबरले; आई आणि मुलाला अटक

INDIA युतीने ठरवले आहे PM कँडिडेटचे नाव, उद्धव ठाकरे यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशमध्ये 5 वार्षांच्या चिमुकल्याची हत्या

सुकमा एन्काऊंटर: पोलीस आणि नक्षलवादींमध्ये लढाई, गोळीबारामध्ये 1 माओवादी ठार

महाराष्ट्रात एका कपलने आवासीय योजनेच्या नावाखाली 1.48 कोटी रुपये लुटले

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकतंत्र संपुष्टात आणता आहेत- अरविंद केजरीवाल

पुढील लेख
Show comments