Marathi Biodata Maker

आता बस प्लास्टिक पिशवी आढळली की दुकानाचा परवाना रद्द

Webdunia
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018 (08:57 IST)
तीन महिन्यांची मुदत प्लास्टिकचा असलेला साठा संपविण्यासाठी देण्यात आली होती. ही मुदतही आता संपलेली आहे.राज्यसरकारने त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी कठोर पावले उचलली आहेत. आता एखादी जरी प्लास्टिकची पिशवी दुकानात आढळल्यास त्या दुकानाचा परवाना रद्द होईल. शिवाय दुकानाला टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाहीर केले आहे. 
 
युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत प्लास्टिक बंदी संदर्भात महत्त्वाची बैठक झाली आहे. प्लास्टिक बंदीसाठी पर्यावरण खात्याला कठोर पावलेउचलण्याचे आदेश देण्यात आल्याचे मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले आहे. प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरण खात्याने कठोर पावले उचलली असून, प्लास्टिक वापरणार नसल्याचं दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतलं जाणार असे नमूद केले आहे. मात्र दुकानदार किंवा अन्य यांना संधी देऊनच ही कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही दुकानात कॅरी बॅग, प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पॅकेजिंग मटेरियल आढळून आली तर त्वरित दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश रामदास कदम यांनी आज दिले आहेत. गणपती उत्सवाच्या काळात थर्माकोलवर शंभर टक्के बंदी केली होती. नवरात्र, दसरा आणि दिवाळीतही थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे असा आग्रह सरकारचा आहे. बंदी नंतर राज्यात 290 टन प्लास्टिक जप्त केले आहे. प्लास्टिक बंदीबाबत भारतात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असल्याबद्दल युनो आणि इंग्लंड देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

मुंबई झोपडपट्टीमुक्त होईल, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी 'झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजने'वर भर देत घोषित केले

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

पुढील लेख
Show comments