Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केवळ निधी अभावी महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले : चंद्रशेखर बावनकुळे

केवळ निधी अभावी महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले : चंद्रशेखर बावनकुळे
Webdunia
शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (08:25 IST)
महसूल मंत्रालयाने ऊर्जा विभागाचे तब्ब्ल 18 हजार कोटी प्रलंबित ठेवले आहेत. केवळ निधी अभावी महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

स्वतःचे वाद बाजूला ठेऊन महसूल मंत्रालयाने त्वरित 20 हजार कोटी ऊर्जा विभागाला द्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाबाबत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम राज्यातील जनता भोगते आहे. निधी अभावी नियोजन गडबडते हे माहिती असताना देखील महसूल मंत्रालयाकडून ऊर्जा विभागाचा 18 हजार कोटींचा निधी थांबविण्यात आला. राज्यात वीज संकट निर्माण होऊ नये यासाठी कोळसाची साठवणूक करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात येत होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
 
राज्यात तीन हजार मेगावॅटचे लोडशेडींग सुरू आहे. वीज बचतीचा संदेश देणे चुकीचे असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उलट वीज वापरल्याने राज्य पुढे जाते, ऊर्जाच्या चुकीच्या नियोजनामुळे हे राज्य अधोगतीला जाते आहे. एकीकडे राज्यातील गरीब शेतकऱ्यांची 500 रुपयांसाठी वीज कापली जाते. दुसरीकडे मात्र 18 हजार कोटींचा महसूल अडवला जातो. हे धोरण चुकीचे असल्याचे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर पाडले

बोईंगने भारतात 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

LIVE: आदित्य ठाकरेंनीही केला कुणाल कामराचा बचाव

स्टुडिओमध्ये तोडफोड करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची संजय राऊतांची मागणी

एकनाथ शिंदेंवरील कुणाल कामराच्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

पुढील लेख
Show comments