Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केवळ निधी अभावी महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले : चंद्रशेखर बावनकुळे

Webdunia
शुक्रवार, 15 एप्रिल 2022 (08:25 IST)
महसूल मंत्रालयाने ऊर्जा विभागाचे तब्ब्ल 18 हजार कोटी प्रलंबित ठेवले आहेत. केवळ निधी अभावी महाराष्ट्रात वीज संकट निर्माण झाले असल्याची घणाघाती टीका राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

स्वतःचे वाद बाजूला ठेऊन महसूल मंत्रालयाने त्वरित 20 हजार कोटी ऊर्जा विभागाला द्यावे अशी मागणी त्यांनी केली. राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाबाबत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दोन मंत्र्यांच्या वादाचे परिणाम राज्यातील जनता भोगते आहे. निधी अभावी नियोजन गडबडते हे माहिती असताना देखील महसूल मंत्रालयाकडून ऊर्जा विभागाचा 18 हजार कोटींचा निधी थांबविण्यात आला. राज्यात वीज संकट निर्माण होऊ नये यासाठी कोळसाची साठवणूक करण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात येत होत्या. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय.
 
राज्यात तीन हजार मेगावॅटचे लोडशेडींग सुरू आहे. वीज बचतीचा संदेश देणे चुकीचे असल्याचे आ. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. उलट वीज वापरल्याने राज्य पुढे जाते, ऊर्जाच्या चुकीच्या नियोजनामुळे हे राज्य अधोगतीला जाते आहे. एकीकडे राज्यातील गरीब शेतकऱ्यांची 500 रुपयांसाठी वीज कापली जाते. दुसरीकडे मात्र 18 हजार कोटींचा महसूल अडवला जातो. हे धोरण चुकीचे असल्याचे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महाराष्ट्र बजेटवर एनसीपी खासदार प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया,

उद्धव ठाकरे बजेटला म्हणाले 'खोटी कहाणी', देवेंद्र फडणवीस म्हणाले- 'त्यांना बजेट समजत नाही...'

महाराष्ट्राच्या बजेटवर विपक्षाचा निशाणा, काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

मुसळधार पावसामुळे निर्माणाधीन घराची भिंत कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू

पुणे पोर्श अपघात प्रकरणात पुणे पोलीसकमिश्नरची भूमिका होती, पण काहीही मिळाले नाही ज्यामुळे कारवाई करावी- देवेंद्र फडणवीस

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र : दारू सोडवण्याच्या नावाखाली बाबाकडून तरुणाला मारहाण

व्हिटिलिगो: कोड किंवा पांढरे डाग हा आजार कसा होतो? यावर काही उपाय आहेत का?

Jio, Airtel नंतर आता Vodafone Idea महागले, शुल्कात 11 ते 24 टक्के वाढ

राज्यातील जनतेला वर्षभरात 3 सिलिंडर मोफत मिळणार, राज्य सरकारची घोषणा

महाराष्‍ट्र सरकारने मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स केला कमी

पुढील लेख
Show comments