Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करोनामुळे नव्हे तर सर्व मृत्यू नैसर्गिक: प्रकाश आंबेडकर

Webdunia
बुधवार, 2 सप्टेंबर 2020 (10:07 IST)
देशात दररोज हजारोंच्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळून येत असून मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही मोठा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनामुळे देशात ६४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच दावा केला आहे. आंबेडकर यांच्याप्रमाणे करोनामुळे मृत्यू होत नसून सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत. 
 
करोना आहे, यावरही विश्वास नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं. त्यांनी ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केलं आहे. 
 
त्यांनी म्हटले की जो माणूस जन्माला आला, त्याचा मृत्यू निश्चित आहेच. जर दहा कोटी लोकांमध्ये दोनशे अडीचशे लोकांचा मृत्यू झाला, तर त्यात नवीन काय आहे? यापेक्षा मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला, तर मी मान्य करेल. परंतू सध्याच्या परिस्थितीत करोनामुळे हे मृत्यू होत नाहीत. सर्व मृत्यू नैसर्गिक आहेत.
 
आंबेडकर म्हणाले की करोना विषाणूच्या संसर्गामुळे व्यक्तीचा मृत्यू होत असल्याचा पुरावा काय कारण? कोणाचीही पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे का? ज्यात करोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असेल. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments