Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार खेचून आणते : राष्ट्रपती

President on Maharashtra Tour
Webdunia
शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (15:28 IST)
महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते. गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतीबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या अनेक महान व्यक्तींमध्ये राज्याच्या महानतेचा विशाल प्रवाह दिसून येतो, असंही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणालेत. मुंबईतल्या राजभवनातील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
 
जर महाराष्ट्राच्या जनतेला राज्याच्या नावाची उत्पत्ती किंवा अर्थ विचारला तर भाषाशास्त्र किंवा इतिहासाच्या संदर्भाची आवश्यकता नाही. थेट तुमच्या ह्रदयातून उत्तर द्याल. आमचा महाराष्ट्र म्हणजेच भारतातील एक महान राज्य, असंही रामनाथ कोविंद म्हणाले. महाराष्ट्र आध्यात्मिक भूमी आहे तसेच अन्यायाविरुद्ध शौर्याने लढणारी आहे. देशभक्तांची भूमी आहे तसेच भागवत भक्तांची भूमी आहे. महाराष्ट्र राज्य देशाचे प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. यावेळच्या दौऱ्यात माझ्या मनात शून्यतेची भावना निर्माण झाली, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राला प्रतिभा आणि निसर्गाचे वरदान लाभले आहे. येथील आदरातिथ्य प्रसिद्ध आहे. यामुळे केवळ मलाच नाही तर देश-विदेशातील असंख्य लोकांना पुन्हा-पुन्हा महाराष्ट्रात यावे वाटते. लतादीदींचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे, अशी भावनाही रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली.
 
महाराष्ट्राची जनता आणि या भूमीचे नक्कीच खास वैशिष्ट्ये जे मला वारंवार याठिकाणी खेचून आणते. गेल्या साडेचार वर्षात मी 12 वेळा महाराष्ट्रात आलो. छत्रपती शिवाजी महाराज, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा ज्योतीबा फुले, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या अनेक महान व्यक्तींमध्ये राज्याच्या महानतेचा विशाल प्रवाह दिसून येतो, असंही ते म्हणालेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

म्यानमारमध्ये भूकंपात मृतांची संख्या 1002 वर पोहोचली, 2376 जखमी, भारता कडून ऑपरेशन ब्रह्मा सुरु

ईदच्या वेळी स्फोट आणि दंगलीच्या संदेशामुळे खळबळ, मुंबईत सुरक्षा व्यवस्था कडक

पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूरला भेट देणार,5000 हून अधिक पोलिस तैनात

LIVE: पंतप्रधान मोदी 30 मार्च रोजी नागपूरला भेट देणार

पुढील लेख
Show comments