Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगात पाण्याचा, प्रदूषणाचा प्रश्न गंभीर, शांतीच्या मार्गानेच त्यावर उत्तर - राष्ट्रपती

Webdunia
सध्या आपल्या देशात आणि पूर्ण जगात पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणत भेडसावत आहे. त्यामुळे अनेक देश चिंतेत आहेत, मात्र आता वेळ आली असून निसर्गासोबत संम्यक दृष्टीकोण ठेवायचा असून, शांतीच्या मार्गानेच पाणी, प्रदूषण प्रश्नावर उत्तर मिळणार असून त्यातून नक्कीच समस्या सुटेल असा विश्वास देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी व्यक्त केले.
 
राष्ट्रपती म्हणाले की मी नुकताच कझाकस्तान येथे दौऱ्यावर होतो, तेथे गेल्यावर कळले की पाण्याची किती गंभीर समस्या आहे. त्यांच्या देशाचे राष्टपती हे या प्रश्नामुळे फार चिंतेत होत, यावरून आपल्या सर्वाना पाहिले पाहिजे की खरच किती गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या संत पुरुषांनी निसर्गासोबत योग्य भाव ठेवावा आणि हवे तितकेच घ्यावे असे शिकवले आहे, त्यामुळे आपणही संम्यक दृष्टीने वागले पाहिजे, शांतीचा, अहिंसेचा मार्गच आपल्याला यातून बाहेर काढेल असे राष्टपती यांनी स्पष्ट केले.
 
बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन उपस्थित आहेत. संमेलन आयोजक स्वामी रविंद्रकीर्तीजी, महामंत्री संजय पापडीवाल आदींनी राष्टपतींचे हेलिपॅडवर स्वागत केले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments