Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्जमाफी, दुष्काळ मदत फक्त गाजर, स्वभिमानीचे मराठवाड्यात आंदोलन

Webdunia
कर्जमाफीच्या नावावर शेतकर्‍यांची घोर फसवणूक झाली असून आताही दुष्काळाचं गाज दाखवलं जात आहे. सरसकट सबंध जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याऐवजी मंडलनिहाय जाहीर केला जात आहे याचा निषेध करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. 
 
शेतकर्‍यांना कर्जमुक्त करुन सातबारा कोरा करावा, स्वामीनाथन यांनी केलेल्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकर्‍याला हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, खरीप पीक विमा १०० टक्के मंजूर करुन तात्काळ द्यावा, तुरीला २५ टक्के पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी, दावणीला चारा द्यावा, कृष्णा खोर्‍याचे २१ टीएमसी पाणी मराठवाड्याला तात्काळ द्यावे, शेतकर्‍यांचे वीज बील आणि त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे साखरेचे दर किमान ३५०० रुपये निर्धारित करावेत आदी मागण्या या मोर्चाने केल्या आहेत. मोर्चात सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी, अ‍ॅड. विजय जाधव, धर्मराज पाटील, महारुद्र चौंड, माणिक कदम, गणेश माडजे, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, रमाकांत मोरे यांचा सहभाग होता.  
 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments