Dharma Sangrah

निवडणुका लक्षात घेऊनच शिवस्मारक भूमिपूजन - चव्हाण

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2016 (16:55 IST)
फक्त डोळ्या समोर निवडणुका ठेवायच्या आणि कामे करायची हेच भाजपा ने केले आहे. गेले दीड  वर्ष शिवस्मारक कामकाज रखडून ठेवल आणि एन निवडणुका जवळ आल्यावर फडणवीस सरकारने शिवस्मारकाचं भूमिपूजन करत आहे  असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.  आज नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते..
 
 महत्त्वाचे असे की  शिवस्मारकाला 17 फेब्रुवारी 2014 रोजी पर्यावरण खात्याची अंतिम मान्यता मिळाली होती,  मग 2015 किंवा 2016 च्या शिवजयंतीला भूमिपूजन का केलं नाही? काम मागे का ठेवल असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला आहे. 
 
शिवस्मारकाची मूळ कल्पना आघाडी सरकारचीच आहे .  माझ्या अध्यक्षतेखाली 2014 मध्ये  समिती नेमली होती. अंतिम पर्यावरण मान्यता जर 17 फेब्रुवारीला  मिळाली, मग 2015 मध्ये भूमिपूजन किंवा 2016 च्या शिवजयंतीला भूमिपूजनाला का केलं नाही? तसंच शिवस्मारकाचं काम मुद्दाम फडणवीस सरकारने  रखडवलं आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार आता उद्घाटन करत आहे. असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
 
सीआरझेडच्या नियमानुसार समुद्रात कोणतंही बांधकाम करता येत नाही. सीआरझेडच्या नियमात बदल करणं आवश्यक होतं. त्यामुळेच पर्यावरणवादी मान्यतेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. कोर्ट शिवस्मारकाबाबत काही हरकत घेणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी,तरदुसरीकडे  ज्यांचे उदर  निर्वाह  ज्यावर अवलंबून आहेत असे मच्छिमारांशी चर्चा करुन प्रश्न सोडवला पाहिजे. शिवस्मारक होणं महत्त्वाचं आहेच, मात्र मच्छिमारांचे प्रश्नही सुटणंही गरजेचं आहे. तुम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देता कामे नाही असे मत चव्हाण आयांनी व्यक्त केले.
 
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना नोटीस देवून अश्या पद्धतीने स्थानबद्ध करणं अत्यंत चुकीचं आहे. निरुपम   शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार होते. त्यामुळे ही दडपशाही योग्य नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवरटीका केली आहे. पंतप्रधानांसमोर आंदोलन करु शकत नाही, असा कोणताही कायदा नाही. नोटाबंदीचा निर्णय फसल्यामुळेच सरकार असं करत आहे. असही चव्हाण म्हणाले आहेत. 
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: हवामान खात्याने अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीची तारीख जाहीर! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलणे बंधनकारक; १५ ऑगस्टपर्यंत मुदत, अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर १६ ऑगस्टपासून दंडात्मक कारवाई होणार

विदर्भात पारा ४६°C च्या पार, अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी

GT vs CSK : आयपीएल २०२६ च्या ६६ व्या सामन्यात चेन्नई आज गुजरातचा सामना करणार

पुढील लेख
Show comments