Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pune : मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर, सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकत्र येणार

Pune : मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर  सोहळ्यात पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकत्र येणार
Webdunia
मंगळवार, 11 जुलै 2023 (16:41 IST)
राज्यात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर राजकीय भूकंप आला आहे. पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर दिसू शकतात. तसेच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहे. आता या कार्यक्रमाला राष्ट्रवादीत पक्षात मोठी फूट पडल्यावर अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र मंचावर दिसू शकतात. शरद पवार यांनी कार्यक्रमाचं आमंत्रण स्वीकारले की नाही हे अद्याप समजू शकले नाही. 
 
1ऑगस्ट या लोकमान्य टिळक यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं वितरण केलं जातं. या वर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या वितरण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती असणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर


Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले; या दिवशी उपस्थित राहावे लागेल

LIVE: 'सौगत-ए-मोदी' नाहीये हे सत्ता जिहाद आहे उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

'त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या, त्याला प्रसाद द्यायला हवा', कुणाल कामराच्या नवीन व्हिडिओवर मंत्री शंभूराज संतापले

मांजरीला घाबरून पळाली उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली, चिमुरडीचा वेदनादायक मृत्यू

संविधान कोणीही बदलू शकत नाही... महात्मा गांधींचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी 'राम राज्य'वर काय म्हटले?

पुढील लेख
Show comments