Marathi Biodata Maker

पुणे :‘भारत’ नावाबाबत रा. स्व. संघ सुरुवातीपासूनच आग्रही

Webdunia
सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (07:40 IST)
जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. ‘भारत’ या नावाला विशेष महत्त्व असून, हे नाव आपल्या प्राचीन संस्कृतीला अनुसरून आहे. आपला देश हा ‘भारत’ असल्याची संघाची आधीपासून धारणा असून, या नावाबाबत आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले.
 
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय राष्ट्रीय बैठक पार पडली. या बैठकीविषयी संघाचे सहसरकार्यवाह डॉ मनमोहन वैद्य आणि अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन नावांवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात विचारले असता डॉ. वैद्य यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.
 
वैद्य म्हणाले, जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. भारत नावाला एक महत्त्व आहे. ते नाव प्राचीन असून सभ्यता, चिंतन याच्याशी जुळते. या नावासाठी आम्ही पहिल्यापासून आग्रही राहिलो आहोत. कारण आपला देश हा ‘भारत’ असल्याचीच आमची सुरुवातीपासून धारणा आहे. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, मंकर संक्रांतीनंतरच्या चांगल्या तीथीवरील मुहूर्तावर प्रतिष्ठापना  केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

प्रज्ञानंदाचा उल्लेखनीय पराक्रम, FIDE सर्किट जिंकून २०२६ कॅंडिडेट स्पर्धेत स्थान मिळवले

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन

International Anti Corruption Day 2025 आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस संपूर्ण माहिती

महायुती आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवेल-उपमुख्यमंत्री शिंदे

शिवसेनेचे २२ आमदार भाजपमध्ये सामील होणार! आदित्य ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्रात राजकीय गोंधळ

पुढील लेख
Show comments